शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

एलबीटी माफी सरसकट नाही!

By admin | Updated: August 1, 2015 04:55 IST

राज्यात सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था करातून (एलबीटी) व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने सरसकट सर्वांना माफी न देता ५० कोटी रुपयांपेक्षा कमी

मुंबई - राज्यात सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था करातून (एलबीटी) व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने सरसकट सर्वांना माफी न देता ५० कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनाच १ आॅगस्टपासून एलबीटीतून सूट दिली आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या निर्णयामुळे ९९.८५ टक्के व्यापाऱ्यांना ५ हजार कोटी रुपयांची सूट मिळणार आहे तर राज्यातील जनतेवर कोणताही अतिरिक्त कर लादण्यात आलेला नाही, असा दावाही सरकारने केला आहे. राज्यात एकूण ८ लाख ९ हजार ५५३ एलबीटी भरणारे व्यापारी असून त्यापैकी ८ लाख ८ हजार ३९१ व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे एलबीटी भरावा लागणार नाही. याकरिता महापालिकांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई देण्याकरिता पुरवणी मागण्यांत २ हजार ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ५० कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या ११६२ व्यापारी व उद्योजकांकडून सरकारला २ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न यापुढेहीसुरू राहणार आहे. मुंबई वगळता २५ महानगरपालिकांमध्ये एलबीटी आहे. तिथे गेल्या पाच वर्षांतील उत्पन्नाचा अभ्यास करून सर्वोच्च आधारभूत उत्पन्नावर ८ टक्के वाढ गृहीत धरून महापालिकांना ७६४८.८२ कोटी देण्यात येणार असल्याचेही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत सांगितले. नागरी भागातून मुद्रांक शुल्कापासून मिळणारे उत्पन्न महापालिकांना दिले जाणार आहे. महापालिकांची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र भरपाई निधी तयार करून त्यातून महापालिकांना निधी देण्यात येणार असल्याचेही खडसे यांनी या वेळी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर अर्थात लोकल बॉडी टॅक्स (एलबीटी) रद्द केल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या निर्णयाने सुमारे ९९ टक्के व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तरीही १ ते २ टक्के व्यापारी अद्याप या कराच्या कचाट्यात सापडलेले आहेत. परिणामी संघटना उरलेल्या व्यापाऱ्यांनाही एलबीटीच्या तावडीतून मुक्त करेपर्यंत लढत राहील. मात्र ग्राहकांना फायदा होणार असल्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो.- मोहन गुरनानी, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र