शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

संरक्षणासाठी कायदा, तरीही होतात हल्ले

By admin | Updated: July 1, 2016 02:03 IST

डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने सरकारला ‘डॉक्टर संरक्षण कायदा’ करावा लागला.

पिंपरी : डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने सरकारला ‘डॉक्टर संरक्षण कायदा’ करावा लागला. कायदा अंमलात येऊन तीन वर्षे उलटली, तरी डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एकीकडे रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना देव मानले जात असताना, दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होतात. डॉक्टरांबद्दलची भावना अलीकडच्या काळात बदलली असून, त्यांच्याविषयीची विसंगती दूर करण्यासाठी प्रतिमा बदलण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे आहे. निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावला, असे आरोप डॉक्टरांवर केले जातात. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक तसेच संतप्त नागरिक डॉक्टरांवर धावून जातात. प्रसंगी मारहाण करतात. जमावाने येणाऱ्या नातेवाइकांना तोंड देणे कठीण होते. डॉक्टरांवर हल्ले होतात, म्हणून कायदा झाला. आता कायदा होऊनही हल्ले होत असतील, तर हल्ला करणाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, अशा भावना ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. डॉक्टर संरक्षण कायदा २०१३ला लागू झाला. डॉक्टर म्हणजे पैशासाठी लोभी माणूस, अशी प्रतिमा समाजात तयार होत आहे. नागरिकांची ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. डॉक्टरांविषयी आपुलकी, आदरभाव त्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. हल्ल्यांसाठी डॉक्टर टार्गेट होऊ लागले, तर उपचारासाठी कोणाकडे जाणार, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय गव्हाणे यांनी व्यक्त केले.विविध रुग्णालयात येणारा वैद्यकीय उपचाराचा खर्च हा वेगवेगळा असतो. हा खर्च त्या रुग्णालयातील सेवा, सुविधांवर आधारित असतो. परंतु, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक ते मान्य करत नाहीत. अनेकदा बिलावरून वाद होतात. रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना जबाबदार धरले जाते. कोणीही डॉक्टर रुग्णाच्या जिवाशी खेळणार नाही. आजाराचे स्वरूप, उपचार करतेवेळी उद्भवणारी परिस्थिती याचा विचार केल्यास रुग्णाच्या नातेवाइ्कांकडून असे प्रकार घडणार नाहीत.डॉक्टर ही एकमेव व्यक्ती आहे की, ती २४ तास सेवा देत असते. मात्र, रुग्ण डॉक्टरांच्या अडचणींचा विचार करत नाही. डॉक्टरांचेच मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. डॉक्टर प्रमाणिक सेवा देण्याचे काम करतात. मात्र, काही मंडळी डॉक्टरांच्या सेवेमध्ये अडथळा आणण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. कुटुंब सदस्य म्हणून डॉक्टरांना मान मिळायला हवा, तरच डॉक्टरांवरील हल्ले कमी होतील, असेही मत डॉक्टरांनी व्यक्त केले. >शासकीय सेवेतील डॉक्टरांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना त्याची झळ अधिक पोहोचते. घटना घडल्यानंतर संघटनेकडून केवळ निषेध नोंदवला जातो.वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे डॉक्टरांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. रुग्णांचे ७० टक्के उपचार हे खासगी रुग्णालयात होतात. छोटी चूकसुद्धा डॉक्टरांना महागात पडते. त्यामुळे डॉक्टर दक्षता घेत असतात. अगदी निष्काळजीपणे ते रुग्णांना हाताळतात, अशा आरोपांमध्ये तथ्य नाही.- डॉ. रोहिदास आल्हाट