शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

हिंदूंसाठी एक कायदा आणि मुसलमानांसाठी वेगळा कायदा ? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 4, 2016 11:15 IST

समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे. या बहुमताचा आदर व्हावा इतकीच आमची अपेक्षा असेल तर कुणाच्या पोटात गोळा येऊ नये अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केले आहे. 
 
समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागविण्याचे जाहीर होताच अनेक मुस्लिम संघटनांनी आदळआपट व आगलावेपणाची भाषा सुरू केली. मात्र या सगळ्यांची पर्वा न करता केंद्र सरकारने समान नागरी कायद्याची ‘फाइल’ पुढे सरकवायला हवी. काँग्रेससारख्या पक्षांचे इतर विरोध मोडून मोदींचे सरकार पुढे चाललेच आहे. समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
एखाद्या गोष्टीवर वेळ काढायचा असेल तर विधी खात्याकडून मत मागितले जाते व या ‘मता’वर नंतर चांगलाच कीस काढला जातो, पण समान नागरी कायद्यावर असे काही घडू नये असे शिवसेनेचे मत आहे. 
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- होईल काय? सरकारचे एक बरे असते. एखाद्या गोष्टीवर वेळ काढायचा असेल तर विधी खात्याकडून मत मागितले जाते व या ‘मता’वर नंतर चांगलाच कीस काढला जातो, पण समान नागरी कायद्यावर असे काही घडू नये व उगाच कीस काढला जाऊ नये असे आम्हाला वाटते. देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारने कायदा आयोगाकडून मत मागविले आहे. देशात सर्व धर्मांसाठी एक आणि एकच कायदा असावा ही मागणी शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाचीदेखील आहेच. हिंदुस्थान हा ‘सार्वभौम’ वगैरे स्वतंत्र देश असला तरी या सार्वभौम स्वतंत्र देशात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गेल्या ६० वर्षांत उच्छादच मांडला गेला. हिंदूंसाठी तो कितीही असह्य असला तरी या बेगडी लोकशाहीचे कोणीच काही वाकडे करू शकले नाही. सार्वभौम हिंदुस्थानात एक घटना नाही. हिंदूंसाठी एक कायदा आहे आणि मुसलमानांसाठी वेगळा कायदा आहे. खरे तर मुसलमानांसाठी वेगळे कायदे म्हणजे आणखी एका पाकिस्तान निर्मितीला ‘फूस’च ठरते, पण मतांच्या लाचारीपोटी मुसलमानांचे हे धार्मिक चोचले पुरवून देश खड्ड्यात घालणारे राज्यकर्तेच हा घात करीत आहेत. म्हणूनच समान नागरी कायद्याचा पुरस्कार करणार्‍या ‘मोदीं’चे राज्य देशावर आल्यापासून लाखो-करोडो राष्ट्रवादी जनतेच्या आकांक्षांना पालवी फुटली आहे.
 
- काँगे्रस शासन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुसलमानांचेच लाड करीत आहे. हिंमत असेल तर देशात समान नागरी कायदा लागू करा!’ अशी परखड भूमिका मांडणार्‍यांचे राज्य देशावर आले आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर व संपूर्ण देशात समान नागरी कायदा आता नक्कीच लागू होईल, असे लोकांना वाटत असेल तर त्यांचे काय चुकले? पण मंदिराचा विषय न्यायालयात लटकला आहे. राम मंदिरप्रश्‍नी न्यायालयाचा निर्णय मानायला हवा, अशी समन्वयाची आणि समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागवून वेळ मारून नेण्याची भूमिका केंद्रातील भाजप सरकारने घेतली आहे. समान नागरी कायद्याबाबत कायदा आयोगाचे मत मागविण्याचे जाहीर होताच अनेक मुस्लिम संघटनांनी आदळआपट व आगलावेपणाची भाषा सुरू केली. या सगळ्यांचा परिणाम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर होईल व ती निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच समान नागरी कायद्याचा ‘शंखनाद’ केला गेला असेल तर ते देशहिताचे नाही. 
 
- समान नागरी कायद्यातच हिंदुस्थानचे हित आहे. व्होट बँकेचे राजकारण देशात अस्थिरता, अराजक निर्माण करीत आहे. मुसलमानांत जी तिहेरी तलाक पद्धत आहे त्यामुळे या समाजातील महिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. ‘शरीयत’ म्हणजे इस्लामी कायद्याला मान्य नाही म्हणून कुटुंब नियोजन करायचे नाही. पाच बायका व पंचवीस पोरांचे लटांबर हे काही सुखी कुटुंबाचे लक्षण नाही. मुसलमान समाज अज्ञान, अंधकारात खितपत पडला आहे व या अंधारातून त्याने बाहेर पडावे असे मुल्लामौलवी व धर्मांध पुढार्‍यांना वाटत नाही यातच खरी ‘मेख’ आहे. समाज ज्ञानी झाला, विचार करू लागला, त्याला आपले बरेवाईट समजू लागले तर हा समाज आपल्या लुंग्यांना व दाढीला आग लावल्याशिवाय राहणार नाही, आपली राजकीय आणि धर्मांध दुकानदारी बंद होईल अशी भीती मुल्लामौलवी आणि धर्मांध मुस्लिम पुढार्‍यांना वाटते. मात्र या सगळ्यांची पर्वा न करता केंद्र सरकारने समान नागरी कायद्याची ‘फाइल’ पुढे सरकवायला हवी. काँग्रेससारख्या पक्षांचे इतर विरोध मोडून मोदींचे सरकार पुढे चाललेच आहे. समान नागरी कायद्याबाबतचा विरोध मोडून सरकारने हे राष्ट्रीय कार्य पुढे न्यावे. आज मोदी सरकारजवळ संपूर्ण बहुमत आहे. या बहुमताचा आदर व्हावा इतकीच आमची अपेक्षा असेल तर कुणाच्या पोटात गोळा येऊ नये.