शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता पालखी अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: October 3, 2016 05:14 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार

मुंबई- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समाजात स्वच्छतेचा संदेश पोहचविणारे संत गाडगेबाबा यांनी ज्या मोटारीतून राज्यात प्रवास केला होता त्या मोटारीचे पालखीत रूपांतर करण्यात आले असून ही पालखी राज्यभर स्वच्छतेचा संदेश देईल. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पालखी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान कालावधीत पालखी मार्गावरील गावे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी भेटी देऊन स्वच्छता स्वयंसेवक स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. यादरम्यान अस्वच्छ ठिकाणे लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छता पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी पथनाट्य, प्रवचने किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता पालखीच्या सन्मानार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालखीच्या वास्तव्याच्या कालावधीचे दिवस हे ह्यस्वच्छता दिवसह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पालखीचा मार्ग कोकण विभागात (२ ते ११ आॅक्टोबर), पुणे विभाग (१२ ते २० आॅक्टोबर), नाशिक विभाग (२१ ते २९ आॅक्टोबर), औरंगाबाद विभाग (३० ते ११ नोव्हेंबर), नागपूर विभाग (१२ ते २१ नोव्हेंबर) आणि अमरावती विभाग (२२ ते ३० नोव्हेंबर) या स्वच्छता पालखी कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी करण्यात येणार आहे.