शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता पालखी अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: October 3, 2016 05:14 IST

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार

मुंबई- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. समाजात स्वच्छतेचा संदेश पोहचविणारे संत गाडगेबाबा यांनी ज्या मोटारीतून राज्यात प्रवास केला होता त्या मोटारीचे पालखीत रूपांतर करण्यात आले असून ही पालखी राज्यभर स्वच्छतेचा संदेश देईल. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पालखी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान कालावधीत पालखी मार्गावरील गावे, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी भेटी देऊन स्वच्छता स्वयंसेवक स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहेत. यादरम्यान अस्वच्छ ठिकाणे लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहेत. ज्या ठिकाणी स्वच्छता पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी पथनाट्य, प्रवचने किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छता पालखीच्या सन्मानार्थ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालखीच्या वास्तव्याच्या कालावधीचे दिवस हे ह्यस्वच्छता दिवसह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पालखीचा मार्ग कोकण विभागात (२ ते ११ आॅक्टोबर), पुणे विभाग (१२ ते २० आॅक्टोबर), नाशिक विभाग (२१ ते २९ आॅक्टोबर), औरंगाबाद विभाग (३० ते ११ नोव्हेंबर), नागपूर विभाग (१२ ते २१ नोव्हेंबर) आणि अमरावती विभाग (२२ ते ३० नोव्हेंबर) या स्वच्छता पालखी कार्यक्रमाचा समारोप संत गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीस्थळी करण्यात येणार आहे.