शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

बंद केलेली दारु दुकाने सुरू

By admin | Updated: March 10, 2017 01:33 IST

लोकांचा संताप आणि त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन एखाद्या गावातील दारुची दुकाने बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असला

मुंबई : लोकांचा संताप आणि त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन एखाद्या गावातील दारुची दुकाने बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असला तरी अशी कारवाई अनिश्चित काळासाठी केली जाऊ शकत नाही, असे नमूद करून उच्च न्यायालयाने नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील शाहपूर गावातील विदेशी दारुची दोन दुकाने पुन्हा सुरु करण्याचा आदेश गुरुवारी दिला.शाहपूर गावात विठ्ठल मल्लू चिंतलवार यांचे ‘हॉटेल जयभवानी’ व कुसुमबाई/ राजाबाई गंगाराम मुंडनवार यांचे विदेशी मद्यविक्रीची दोन परवानाधारक ठिकाणे आहेत. गावातील महिलांचा संताप लक्षात घेऊन देगलूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही दुकाने ‘पुढील आदेश होईपर्यंत’ बंद ठेवण्याचा आदेश ३१ जानेवारी रोजी जारी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश १७ फेब्रुवारी रोजी कायम केला.दोन्ही परवानाधारकांनी या कारवाईविरुद्ध रिट याचिका करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. न्या. एस. बी. शुक्रे यांनी या याचिका मंजूर करून दोन्ही आदेश बेकायदा ठरवून रद्द केले व दारुची दोन्ही दुकाने पुन्हा खुली करण्याचा आदेश दिला. पुन्हा गरज भासल्यास पोलीस व जिल्हाधिकारी दारुबंदी कायद्याच्या कलम १४२ मधील अधिकारांचा वापर करून ही दुकाने बंद करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.ग्रामसभेने ठराव केल्यास किंवा गावातील बहुसंख्य महिला मतदारांनी लेखी निवेदन दिल्यास गावातील परवानाधारक मद्यालये व दारुची दुकाने बंद करण्याचे अधिकार राज्य सरकारने दारुबंदी कायद्यान्वये आदेश काढून सन २००८ पासून जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत असेल तर दारु दुकाने बंद करण्याचा अधिकार दारुबंदी कायद्याच्या कलम १४२(२) अन्वये पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांना आहे. (विशेष प्रतिनिधी)व्यवहार्य न्यायाचा निर्णयहा निकाल देताना न्या. शुक्रे यांनी केवळ कायदा न पाहता व्यवहार्य न्याय होईल, हेही पाहिले. शाहपूर गावातील सध्याची परिस्थिती काय आहे, याची त्यांनी चौकशी केली. परंतु सरकारी वकील ती माहिती देऊ शकले नाहीत.त्यामुळे गावात या विषयी अशांत वातावरण किंवा लोक रस्त्यावर उतरल्याचे चित्र सध्या तरी नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी गृहित धरले. अशा परिस्थितीत मुळात तात्पुरता असलेला व इतके दिवस बेकायदेशीरपणे लागू राहिलेला दुकाने बंद ठेवण्याचा आदेश यापुढे सुरु ठेवणे इष्ट नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला.