शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

‘जलपरी’ला लातूरकरांचा निरोप

By admin | Updated: August 9, 2016 19:47 IST

लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी

ऑनलाइन लोकमत
 
लातूर, दि. 8 -  लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी सकाळी भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्त ‘जलपरी’च्या चालकांसह रेल्वे प्रशासनातील अधिका-यांचा सत्कार करून लातूरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तर प्रमुख उपस्थिती महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, आयुक्त सुधाकर तेलंग, उपमहापौर चाँदपाशा घावटी, चंद्रकांत चिकटे, एस.आर. देशमुख, विक्रांत गोजमगुंडे, रविशंकर जाधव, मोईज शेख यांची होती. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रेल्वे चालक, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाºयांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जलपरीला निरोप देण्यासाठी विविध पक्षांसह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. जलपरीला फुलांनी सजविण्यात आले होते. आज जलपरीची १११ वी फेरी होती. यातून २५ कोटी ७० लाख लिटर पाणीपुरवठा रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. १२ एप्रिलला ‘जलपरी’ची पहिली फेरी लातूर रेल्वेस्थानकावर झाली. १२ ते २२ एप्रिल दरम्यान ५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर २३ एप्रिल ते ९ आॅगस्ट या कालावधीत दर खेपेला २५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. 
 
साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी... 
टंचाईवर मात करण्याइतपत अद्यापही धरण क्षेत्रात पाणी उपलब्ध नाही. मात्र गेल्या आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे तीन ते साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. भविष्यात पाऊस पडला तर जलपरीची गरज भासणार नाही. यासाठी लातूरकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तेलंग यांनी केले आहे. 
 
सहकार्यामुळे संकटावर मात... 
लातूर शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने केलेले सहकार्य अनमोल आहेत. लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे आदेश प्रशासनाला मिळाले आणि सर्व विभाग आणि रेल्वे प्रशासनासह लातूरकरांच्या सहकार्यामुळे या पाणीटंचाईवर चार महिन्यांमध्ये मात करता आली, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. 
 
यांचा झाला गौरव... 
लातूरकरांची तहान भागविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाºयांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये लोको पायलट अशोककुमार, सुरक्षा गार्ड ए.आर. शेख, नाईक, गोपाल पाटील, अमोल कांबळे, स्टेशन प्रबंधक घाडगे, मुख्य वाणिज्य निरीक्षक रमेश काळे, मेकॅनिकल इंजिनिअर औसेकर, वाहतूक निरीक्षक मिश्रा, माल पर्यवेक्षक आर.एस. ओव्हळ, वाघमारे, जावेद शेख, श्रीकांत रंगनाथन, निजाम शेख, प्रगती कन्स्ट्रक्शनचे गोविंद माकणे आदींचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.