शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

दुष्काळातही लातूरच्या व्यापाऱ्याचा अनोखा ‘अश्वछंद’!

By admin | Updated: May 2, 2016 00:13 IST

पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या लातूर जिल्ह्यात सत्तारभार्इंनी आपला जगावेगळा घोड्यांचा छंद जिवापाड जपला आहे. त्यांच्या तबेलात देश-विदेशातील २२ घोडे असून

- राजकुमार जोंधळे, लातूर

पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे हैराण झालेल्या लातूर जिल्ह्यात सत्तारभार्इंनी आपला जगावेगळा घोड्यांचा छंद जिवापाड जपला आहे. त्यांच्या तबेलात देश-विदेशातील २२ घोडे असून त्यावर ते महिनाकाठी तब्बल आठ लाखांवर खर्च करतात. अंबाजोगाई येथील अर्ध्या एकरावरील जागेत हा तबेला उभारला आहे. या तबेल्याच्या देखरेखीसाठी १५ नोकरांचा ताफाही दिमतीला आहे. अनेकजण लग्नसोहळ््यासाठी किंवा रेससाठी घोड्याचा व्यावसायिक वापर करतात. मात्र अब्दुलभार्इंनी केवळ छंद म्हणून हे घोडे पाळले आहेत. प्रत्येक घोड्यास दिवसातून एकवेळ अंघोळ घातली जाते. तर एकवेळ मालिश केली जाते. विशेष म्हणजे उन्हाची तीव्रता जाणवू नये यासाठी कुलर आणि पंख्यांची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक घोड्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांच्या शरीरयष्टीवर लक्ष देण्यासाठी जाणकार नोकरांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळ आणि संध्याकाळ चंदी दिली जाते. यात पेंड, चना, गव्हाचा भुसा या पशुखाद्याचा समावेश आहे. पशुप्रदर्शनात अव्वल...राज्यभरातील पुणे, करमाळा, अकलूज, सारंगखेडा, परळी, नांदेड, माळेगाव यात्रा, लातूरची सिध्देश्वर यात्रा, सोलापूर गड्डा यात्रा आणि उस्मानाबाद येथील पशुप्रदर्शनात ‘राजधानी’ घोडीने चॅम्पियनशीप मिळविली आहे. तर अन्य तीन घोड्यांनी महाराष्ट्र केसरी पटकावले आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रदर्शनात आणि स्पर्धेत अब्दुलसत्तारभाई खोरीवाले यांच्या घोड्यांचा सहभाग असतोच.राज्यस्तरीय कृषीउद्योग पुरस्काराने सन्मानित...शहरातील अंबाजोगाई रोडवर एकाच तबेल्यात तब्बल २२ घोडे पाहण्याची उत्तम संधी अब्दुल सत्तारभाई खोरीवाले यांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी त्यांनी विविध जातींचे घोडे, घोडी ठेवल्या आहेत. त्यासाठी तब्बल आठ लाखांचा खर्चही ते करतात. ७५ एकर शेती असून, याच शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण दुग्ध व्यवसायही थाटला आहे. २०१५ साली सत्तारभार्इंना महात्मा फुले शिक्षक परिषदेने राज्यस्तरीय कृषीउद्योग पुरस्काराने सन्मानित केले आहे. छंद म्हणून त्यांनी या घोड्यांचे पालनपोषण गेल्या अनेक वर्षांपासून पदरमोड करुन केले आहे. मुळात माणसाला छंद असला की, हे सर्व घडते...असे अब्दुल सत्तारभाई खोरीवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४५ कुटुंबांना रोजगार... ७५ एकर शेती, २२ घोडे, ३० म्हशी आदीं व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी वार्षिक ७० हजारांचे ३० सालगडी ठेवले आहेत. यासह इतर १५ नोकर हे महिनेवारी वेतनावर ठेवले आहेत. त्यामुळे ४५ कुटुंबांना सत्तारभार्इंनी रोजगार दिला आहे.