शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपुरात मोर्चावर लाठीमार

By admin | Updated: December 17, 2015 03:10 IST

शासकीय सेवेत कायम करा, या प्रमुख मागणीसह मंगळवारपासून रस्त्यावर उतरलेल्या राज्यभरातील संगणक परिचालकांच्या मोर्चावर बुधवारी सकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

नागपूर : शासकीय सेवेत कायम करा, या प्रमुख मागणीसह मंगळवारपासून रस्त्यावर उतरलेल्या राज्यभरातील संगणक परिचालकांच्या मोर्चावर बुधवारी सकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात २००हून अधिक मोर्चेकरी जखमी झाले असून, त्यातील तिघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींमध्ये २० ते २५ महिलांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातील सुमारे २२ हजार संगणक परिचालक सहभागी असून, त्यांचा हा मोर्चा टेकडी रोडवर अडविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीत अख्खी रात्र रस्त्यावर काढलेल्या मोर्चेकऱ्यांनी बुधवारी सकाळी अचानक आक्रमक भूमिका घेतली. काहींनी घोषणाबाजी करीत सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा, तर काहींनी पोलिसांचे कठडे तोडून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अगोदर वज्र व वरुणच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. परंतु मोर्चेकऱ्यांनी त्यालाही जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यामुळे पळापळीत चेंगराचेंगरीही झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोर्चेस्थळी पोहोचून पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध नोंदविला.ही जीवन-मरणाची लढाई...हा राज्यभरातील २७ हजार संगणक परिचालकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार आम्हाला न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.जोश कायम ...लाठीमारामध्ये कुणाचा हात मोडला तर कुणाच्या पायाला गंभीर जखम झाली. शिवाय संघटनेचे अध्यक्ष सिद्घेश्वर मुंडे यांच्यासह अनेकांच्या शरीरावर लाठ्यांचे वळ उमटले. मात्र असे असताना सर्व मोर्चेकऱ्यांतील जोश कायम होता. रात्री उशिरापर्यंत सर्व मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून होते.मोर्चाचे कारण काय?सर्व ग्रामपंचायतींमध्ये २०११ पासून सुमारे २७ हजार तरुण-तरुणी ‘महाआॅनलाइन’ या कंपनीच्या माध्यमातून संगणक परिचालक म्हणून काम करीत आहेत. या कंपनीने सर्व संगणक परिचालकांना मोबाइलद्वारे संदेश पाठवून ३१ डिसेंबर रोजी सर्वांचे कंत्राट संपत असून, यानंतर कुणालाही नोकरी देण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.