शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मेच्या अखेरपासूनच बरसणार सरी!

By admin | Updated: May 13, 2016 05:04 IST

यंदा राज्यात ३० मे ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठाणे : यंदा राज्यात ३० मे ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३१.३ टक्के अधिक पाऊस विदर्भात, तर २८.२ टक्के पाऊस मध्य महाराष्ट्रात पडेल, असा अंदाज आहे. त्याखालोखाल कोकणात २७.५ टक्के, तर मराठवाड्यात २४.९ टक्के पाऊस पडेल आणि दुष्काळाच्या छायेतील महाराष्ट्राला दिलासा मिळेल, अशी चिन्हे असल्याचे मान्सूनच्या पूर्वानुमानात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील पावसाची सरासरी यंदा गाठली जाईल असे नव्हे, तर साधारण १०६ टक्के इतके प्रमाण गाठले जाईल, असेही या निष्कर्षात म्हटले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्या आढाव्यावेळी प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या सादरीकरणात हा तपशील दिला आहे. > आयआयटीएम आणि हवामान खाते एकत्रया मान्सून पूर्वानुमानाचा वापर आपत्कालीन व्यवस्थापन, हवामान परिवर्तनशीलतेचे अनुकूल परिणाम, पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापनासाठी केला जातो. मान्सूनदरम्यान विजांचा कडकडाट, वीज पडणे, त्यातून होणारे आणि पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी अभ्यास करणे आणि त्यावरील संशोधन याची जबाबदारी पुण्यातील आयआयटीएम आणि भारतीय हवामान खाते एकत्रितरीत्या पार पाडते आहे. त्याचा तपशीलही या आपत्कालीन नियोजनाच्या बैठकीत देण्यात आला. त्या माहितीचा वापर करून आपत्कालीन प्रसंगांचे पूर्वनियोजन करणे, त्यासाठी विविध यंत्रणांचा समन्वय साधणे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत होऊ शकते, याचाही ऊहापोह या बैठकीत करण्यात आला. >केरळमध्ये पाऊस वेळेत दाखल होईल. पण, महाराष्ट्रात ३० मेपासूनच वळवाचे आगमन होईल व राज्यात सर्वत्र त्याचे आगमन ठरल्यावेळी होईल, असा दिलासादायक अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. > मार्चच्या हवामानाच्या स्थितीवरून जून ते सप्टेंबर या महिन्यांतील पावसाच्या टक्केवारीचा अंदाज पुण्याच्या आयआयटीएम व सीएफएसच्या प्रायोगिक मानकांवर आधारित आहे. त्यांनी याआधी वर्तवलेला पावसाचा अंदाज जवळजवळ खरा ठरला आहे.