शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

साडेतीन महिन्यांत बजेटमधील तेराच टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 03:53 IST

एप्रिल ते १५ जुलै या कालावधीत राज्याच्या एकूण बजेटच्या फक्त १३ टक्के निधी खर्च झाला असून, यातील बहुतांश भाग हा पगार, निवृत्तीवेतन यावर खर्च झाला आहे

अतुल कुलकर्णी,  मुंबईएप्रिल ते १५ जुलै या कालावधीत राज्याच्या एकूण बजेटच्या फक्त १३ टक्के निधी खर्च झाला असून, यातील बहुतांश भाग हा पगार, निवृत्तीवेतन यावर खर्च झाला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात विकासकामांवर फारसा निधी खर्ची पडलेला नाही. मात्र, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत एकूण बजेटच्या ६० टक्के बजेट खर्च होण्याची आजवरची प्रथा रोखण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडेतीन महिन्यांत मिळालेल्या एकूण बजेटच्या ३५.२८ टक्के खर्च करून मुख्यमंत्र्यांकडे काही काळ असणाऱ्या कृषी खात्याने आणि वन विभागाने यात पहिला नंबर मिळवलेला असून, गिरीश बापट यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाने फक्त १.२० टक्के निधी खर्च करून खालून पहिला नंबर मिळवलेला आहे. राज्याचे प्लॅन आणि नॉनप्लॅन असे एकत्रित बजेट २,८१,४२३ कोटी आहे. त्यापैकी पहिल्या तीन महिन्यांत १,०८,७१९ कोटी रुपये त्या-त्या विभागांना उपलब्ध झाले. त्यापैकी, फक्त ३८,०१० कोटी रुपये १५ जुलै पर्यंत खर्च झाले आहेत. त्याच वेळी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तब्बल ५,५०० कोटींच्या पुरवणी मागण्या येऊ घातल्या आहेत. वन विभागाची एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृष्य परिणाम या दोनच योजना या साडेतीन महिन्यांत नोंद घेण्याजोग्या म्हणून समोर आल्या आहेत.पुरवणी मागण्यांना लगाम घालणार पुरवणी मागण्या ३ हजार कोटींच्या वरती जाऊ नयेत, असे माझे मत आहे, पण गेल्या वर्षी दुष्काळ, शेतीमुळे पुरवणी मागण्या वाढल्या. बांधकाम विभागाने ४५० कोटींच्या मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल, पण ते वाढू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. - सुधीर मुनगंटीवार, वित्त व नियोजन मंत्री