शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

साडेतीन महिन्यांत बजेटमधील तेराच टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 03:53 IST

एप्रिल ते १५ जुलै या कालावधीत राज्याच्या एकूण बजेटच्या फक्त १३ टक्के निधी खर्च झाला असून, यातील बहुतांश भाग हा पगार, निवृत्तीवेतन यावर खर्च झाला आहे

अतुल कुलकर्णी,  मुंबईएप्रिल ते १५ जुलै या कालावधीत राज्याच्या एकूण बजेटच्या फक्त १३ टक्के निधी खर्च झाला असून, यातील बहुतांश भाग हा पगार, निवृत्तीवेतन यावर खर्च झाला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात विकासकामांवर फारसा निधी खर्ची पडलेला नाही. मात्र, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत एकूण बजेटच्या ६० टक्के बजेट खर्च होण्याची आजवरची प्रथा रोखण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.साडेतीन महिन्यांत मिळालेल्या एकूण बजेटच्या ३५.२८ टक्के खर्च करून मुख्यमंत्र्यांकडे काही काळ असणाऱ्या कृषी खात्याने आणि वन विभागाने यात पहिला नंबर मिळवलेला असून, गिरीश बापट यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाने फक्त १.२० टक्के निधी खर्च करून खालून पहिला नंबर मिळवलेला आहे. राज्याचे प्लॅन आणि नॉनप्लॅन असे एकत्रित बजेट २,८१,४२३ कोटी आहे. त्यापैकी पहिल्या तीन महिन्यांत १,०८,७१९ कोटी रुपये त्या-त्या विभागांना उपलब्ध झाले. त्यापैकी, फक्त ३८,०१० कोटी रुपये १५ जुलै पर्यंत खर्च झाले आहेत. त्याच वेळी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तब्बल ५,५०० कोटींच्या पुरवणी मागण्या येऊ घातल्या आहेत. वन विभागाची एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याचा उपक्रम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृष्य परिणाम या दोनच योजना या साडेतीन महिन्यांत नोंद घेण्याजोग्या म्हणून समोर आल्या आहेत.पुरवणी मागण्यांना लगाम घालणार पुरवणी मागण्या ३ हजार कोटींच्या वरती जाऊ नयेत, असे माझे मत आहे, पण गेल्या वर्षी दुष्काळ, शेतीमुळे पुरवणी मागण्या वाढल्या. बांधकाम विभागाने ४५० कोटींच्या मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल, पण ते वाढू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. - सुधीर मुनगंटीवार, वित्त व नियोजन मंत्री