शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

साडेबारा टक्के योजना शेवटच्या टप्प्यात

By admin | Updated: April 6, 2017 02:31 IST

साडेबारा टक्के योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ७७६ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे.

कमलाकर कांबळे,नवी मुंबई- साडेबारा टक्के योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ७७६ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ७४ हेक्टर जमिनीचे डिसेंबरपर्यंत वाटप पूर्ण करून ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार संबंधित विभागाने कंबर कसली आहे. नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने येथील ९५ गावांतील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित केली. भूमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नंतर साडेबारा टक्के भूखंड वाटप योजना सुरू करण्यात आली, परंतु सुरुवातीपासूनच ही योजना भ्रष्टाचाराला चालना देणारी ठरली. या विभागातील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे सुनियोजित शहराचा निर्मितीचा बोलबाला असलेल्या सिडकोची पुरती बदनामी झाली. भूखंडांचे श्रीखंड लाटणारे दलाल आणि बिल्डर्स मंडळींचा या विभागाला विळखा पडला. सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनीही या मंडळींसाठी पायघड्या अंथरल्याने ज्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली, ते प्रकल्पग्रस्त मात्र त्यापासून वंचित राहिले. या सर्वांचा परिणाम म्हणून या योजनेला म्हणावी तसी गती देता आली आहे. प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीच्या बदल्यात या योजनेअंतर्गत ८५0 हेक्टर जमिनीचे वाटप करायचे आहे. मात्र विविध कारणांमुळे गेल्या वीस वर्षांत केवळ ७७६ हेक्टर जमिनीचेच वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ७४ टक्के जमिनीच्या वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. सध्या केवळ ७ टक्के प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. यात पनवेल, उरण व ठाणे तालुक्यातील (नवी मुंबई) प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील प्रलंबित प्रकरणांचा टप्प्याटप्प्याने निपटारा करण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत प्रलंबित राहिलेली सर्व प्रकरणे निकाली काढून साडेबारा टक्केची योजनाच बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तशा आशयाच्या सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.>अद्यापि जवळपास तीन हजार प्रलंबित प्रकरणे आहेत. यातील शंभर ते दीडशे प्रकरणे न्यायालयीन दावे, वारसा हक्क, अनधिकृत बांधकामे आदींच्या वादात अडकलेली आहेत. ही न्यायप्रविष्ट प्रकरणे सध्या विचारात न घेतली जाणार नाहीत. त्यामुळे येत्या काळात वाटपायोग्य असलेल्या प्रकरणांवरच कार्यवाही करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. २० वर्षे उलटली तरी योजना सुरूचकोणतीही योजना सुरू करताना ती बंद करण्यासाठी कालमर्यादाही निश्चित केलेली असते. साडेबारा टक्के भूखंडवाटप योजनेलाही सुरुवातीच्या काळात तशी कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती; परंतु विविध कारणांमुळे ही योजना दीर्घकाळ सुरू ठेवावी लागली आहे. २० वर्षे उलटली, तरी ही योजना सुरूच आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात सिडकोने २२.५ टक्के भूखंड योजना सुरू केली आहे. आगामी काळात साडेबारा टक्के आणि २२.५ टक्के या दोन्ही योजनांवर काम करताना सिडकोची दमछाक होणार आहे. या पार्श्वभूमीवर साडेबारा टक्के भूखंड योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून ही योजना बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.