शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावरून जमीन झाली गायब

By admin | Updated: September 20, 2016 01:51 IST

नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे.

बारामती : तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथे नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे. यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथील नर्मदाबाई शेळके यांनी १८ जुलै १९९४ साली गट क्र. ९०२ मधील ८० आर तसेच त्याच गटातून भगवान नानासाहेब शेळके यांनी ८० आर क्षेत्र खरेदी केले होते. त्यानंतर ६ जुलै १९९८ रोजी ४० आर शेतजमीन गुलाबराव पानसरे यांच्याकडून नर्मदाबाई यांनी खरेदीखताने विकत घेतली होती. खरेदी केल्यापासून शेळके हे शेतजमीन वहिवाटत होते. तसेच अजितदादा विविध कार्यकारी सोसायटीकडून ते नियमित कर्जही काढत होते. मात्र, खरीप हंगामातील पीककर्ज काढण्यासाठी ते सातबारा आणण्यासाठी सुपा येथे गेले असता त्यांचे नाव सातबाऱ्यातून गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांची जमीनच गायब झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जमीन विकत देणाऱ्या पानसरे कुटुंबीयातील दत्तात्रय पानसरे व वसंत पानसरे यांचा जमीनवाटपाचा दावा न्यायालयात दाखल केला होता. याबाबत शेळके अनभिज्ञ होते. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने याचा पानसरे यांनी फायदा उचलत तहसीलदार, भूमी अभिलेख, मंडल अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून आपणावर अन्याय केला असल्याचा आरोप नर्मदा शेळके यांनी केला. (वार्ताहर)पानसरे दोन्ही भावांमध्ये गेल्या २० वर्षांपासून जमीनवाटपावरून कोर्टात वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात दोघांनी गट क्र. ९०२ मधील जमिनीची विक्री केली आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम निर्णयावेळेस सुधारित सातबारा न दिल्याने नर्मदा शेळके यांचे नाव कमी झाले आहे. नायब तहसीलदारांनी जमीनवाटप केले आहे. मी केवळ सातबाऱ्यावर इफेक्ट दिला आहे.- आर. आर. जगदाळे, तलाठी, सुपे