शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

सातबारावरून जमीन झाली गायब

By admin | Updated: September 20, 2016 01:51 IST

नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे.

बारामती : तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथे नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे. यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथील नर्मदाबाई शेळके यांनी १८ जुलै १९९४ साली गट क्र. ९०२ मधील ८० आर तसेच त्याच गटातून भगवान नानासाहेब शेळके यांनी ८० आर क्षेत्र खरेदी केले होते. त्यानंतर ६ जुलै १९९८ रोजी ४० आर शेतजमीन गुलाबराव पानसरे यांच्याकडून नर्मदाबाई यांनी खरेदीखताने विकत घेतली होती. खरेदी केल्यापासून शेळके हे शेतजमीन वहिवाटत होते. तसेच अजितदादा विविध कार्यकारी सोसायटीकडून ते नियमित कर्जही काढत होते. मात्र, खरीप हंगामातील पीककर्ज काढण्यासाठी ते सातबारा आणण्यासाठी सुपा येथे गेले असता त्यांचे नाव सातबाऱ्यातून गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांची जमीनच गायब झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जमीन विकत देणाऱ्या पानसरे कुटुंबीयातील दत्तात्रय पानसरे व वसंत पानसरे यांचा जमीनवाटपाचा दावा न्यायालयात दाखल केला होता. याबाबत शेळके अनभिज्ञ होते. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने याचा पानसरे यांनी फायदा उचलत तहसीलदार, भूमी अभिलेख, मंडल अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून आपणावर अन्याय केला असल्याचा आरोप नर्मदा शेळके यांनी केला. (वार्ताहर)पानसरे दोन्ही भावांमध्ये गेल्या २० वर्षांपासून जमीनवाटपावरून कोर्टात वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात दोघांनी गट क्र. ९०२ मधील जमिनीची विक्री केली आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम निर्णयावेळेस सुधारित सातबारा न दिल्याने नर्मदा शेळके यांचे नाव कमी झाले आहे. नायब तहसीलदारांनी जमीनवाटप केले आहे. मी केवळ सातबाऱ्यावर इफेक्ट दिला आहे.- आर. आर. जगदाळे, तलाठी, सुपे