शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्यात वन्यजिवांविषयी लेखनाचा अभाव

By admin | Updated: March 7, 2017 02:04 IST

मराठी साहित्यात वन्यजिवांविषयीही पुरेसे लेखन झालेले नाही, अशी खंत वन्यजीवविषयक ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

मुंबई : मराठी साहित्यात वन्यजिवांविषयीही पुरेसे लेखन झालेले नाही, अशी खंत वन्यजीवविषयक ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात रविवारी सुधीर महाबळ लिखित ‘परतवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘कित्येक लेखकांनी वारी या विषयावर लेखन केले आहे. परंतु कोणत्याच लेखकाने परतवारी हा विषय हाताळला नाही. सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ पुस्तकाच्या रूपाने त्याबद्दलचे अपूर्ण साहित्य पूर्ण केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, मराठी साहित्यात वन्यजीव, जलचर, झाडे आणि फुलांबद्दल खोलवर लिहिण्यात आलेले नाही. ही कमतरता भरून निघण्यासाठी नव्या पिढीने लिहिते होण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. रवीन थत्ते म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने मला ‘वैभव वारी’ आणि ‘वैराग्य वारी’ असे दोन नवे शब्द आणि त्यांचा अर्थ समजला. परतवारी ही एखाद्या बखरीप्रमाणे आहे. शरद काळे म्हणाले, ‘पुण्य नसलेल्या’ परतीच्या वारीवर खूप सुंदर लेखन सुधीर महाबळ यांनी केले आहे. वारकऱ्याच्या घरात जन्माला येऊनही सुधीरने पायवारी करायला थोडा उशीरच केला. परंतु परतीची वारी गेली १६ वर्षे ते अक्षरश: जगत असल्याने त्यांना हे पुस्तक लिहिता आले. लेखक सुधीर महाबळ म्हणाले, ‘वारीला जातानाचा प्रवास हा २१ दिवसांचा असतो. तोच प्रवास येताना १० दिवसांत पूर्ण करायचा असतो. मी २००६ सालापासून परतवारी करत आहे. या प्रवासात आलेले अनुभव, छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळालेले धडे, माणसांमधला स्वार्थ आणि परमार्थ, परतवारीदरम्यान भेटलेल्या व्यक्ती आणि प्रसंग या सगळ्यांना एकत्र गुंफून हे पुस्तक लिहिले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अध्यक्ष अरविंद पाटकर, शरद काळे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू, अच्युत गोडबोले, दीपा देशमुख आणि डॉ. मनीषा फडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)