शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्यात वन्यजिवांविषयी लेखनाचा अभाव

By admin | Updated: March 7, 2017 02:04 IST

मराठी साहित्यात वन्यजिवांविषयीही पुरेसे लेखन झालेले नाही, अशी खंत वन्यजीवविषयक ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.

मुंबई : मराठी साहित्यात वन्यजिवांविषयीही पुरेसे लेखन झालेले नाही, अशी खंत वन्यजीवविषयक ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात रविवारी सुधीर महाबळ लिखित ‘परतवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘कित्येक लेखकांनी वारी या विषयावर लेखन केले आहे. परंतु कोणत्याच लेखकाने परतवारी हा विषय हाताळला नाही. सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ पुस्तकाच्या रूपाने त्याबद्दलचे अपूर्ण साहित्य पूर्ण केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, मराठी साहित्यात वन्यजीव, जलचर, झाडे आणि फुलांबद्दल खोलवर लिहिण्यात आलेले नाही. ही कमतरता भरून निघण्यासाठी नव्या पिढीने लिहिते होण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. डॉ. रवीन थत्ते म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने मला ‘वैभव वारी’ आणि ‘वैराग्य वारी’ असे दोन नवे शब्द आणि त्यांचा अर्थ समजला. परतवारी ही एखाद्या बखरीप्रमाणे आहे. शरद काळे म्हणाले, ‘पुण्य नसलेल्या’ परतीच्या वारीवर खूप सुंदर लेखन सुधीर महाबळ यांनी केले आहे. वारकऱ्याच्या घरात जन्माला येऊनही सुधीरने पायवारी करायला थोडा उशीरच केला. परंतु परतीची वारी गेली १६ वर्षे ते अक्षरश: जगत असल्याने त्यांना हे पुस्तक लिहिता आले. लेखक सुधीर महाबळ म्हणाले, ‘वारीला जातानाचा प्रवास हा २१ दिवसांचा असतो. तोच प्रवास येताना १० दिवसांत पूर्ण करायचा असतो. मी २००६ सालापासून परतवारी करत आहे. या प्रवासात आलेले अनुभव, छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळालेले धडे, माणसांमधला स्वार्थ आणि परमार्थ, परतवारीदरम्यान भेटलेल्या व्यक्ती आणि प्रसंग या सगळ्यांना एकत्र गुंफून हे पुस्तक लिहिले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अध्यक्ष अरविंद पाटकर, शरद काळे, ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू, अच्युत गोडबोले, दीपा देशमुख आणि डॉ. मनीषा फडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)