शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी पर्यायी व्यवस्थेची बेफिकिरी

By admin | Updated: July 1, 2016 01:35 IST

जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे.

पुणे : जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे. अवघे २४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे. त्यावेळी पाणी उपलब्धतेच्या पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असताना ते पूर्ण बेफिकीर दिसून येत आहेत. आयुक्त, महापौरांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे आदेश देऊनही त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असणारे अनेक स्रोत शहरात असताना त्याबाबतही प्रशासन पूर्ण अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमध्ये एकूण १.४८ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी नुकतीच या धरणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या रमजानचा सण असल्याने ७ जुलैपर्यंत कोणतीही वाढीव पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापौरांनी प्रशासनाला विहिरींची स्वच्छता करणे, बोअरवेल, पाण्याचे मोठे स्रोत असलेल्या झरे आदींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.शहरामध्ये ३०० विहिरी आहेत, त्या विहिरीत पाण्याची स्वच्छता करून तिथे टँकर भरण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. विहिरीतील हे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी उपयोग आणता येणे सहज शक्य आहे. शहरामध्ये इमारतींचे बांधकाम करताना अचानक पाण्याचे मोठे झरे आढळून आले आहेत. या झऱ्यांमधील पाणी ड्रेनेजमध्ये टाकले जात आहे किंवा ते झरे बुजविण्यात आले आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे. शहराला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. केवळ पाटबंधारे विभाग किती पाणी सोडेल या आशेवर अवलंबून राहण्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाला घेता येणार नाही. शहरामध्ये सप्टेंबर महिन्यापासून पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्याच वेळी पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. >शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जादा दाबाने व पूर्वीपेक्षा जास्त वेळ पाणी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.शहरात मोतीबाग व टिळक रोड येथे पाण्याचे दोन मोठे स्रोत लागले आहेत. मोतीबाग येथून दररोज १० ते १२ टँकर पाणी उचलून ते बागेसाठी वापरले जात आहे, प्रत्यक्षात येथून दररोज २० ते २५ टँकर पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र या पाण्याला फारशी मागणी नसल्याने दहा ते बारा टँकरच पाणी उचलले जात आहे. विहिरीतील पाण्याची अद्याप स्वच्छता केलेली नाही.’’- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख