शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

इतिहासातील कुंभमेळे !

By admin | Updated: July 12, 2015 02:23 IST

कुंभमेळ््याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा उल्लेख कुठेही नाही. विष्णुपुराण, रामायण, महाभारत, मत्स्यपुराण या पुराणग्रंथांमध्ये कुंभस्नानाचे महत्त्व नमूद आहे.

इतिहासातील कुंभमेळे !कुंभमेळ््याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा उल्लेख कुठेही नाही. विष्णुपुराण, रामायण, महाभारत, मत्स्यपुराण या पुराणग्रंथांमध्ये कुंभस्नानाचे महत्त्व नमूद आहे. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू एन त्संग हा सातव्या शतकात भारतात आला होता. त्यावेळी तो हरिद्वार आणि अलाहाबाद कुंभमेळ््याला उपस्थित राहिला होता. त्याने कनोजचा चक्रवर्ती सम्राट हर्षवर्धन याचा कुंभमेळ््यातील सहभाग पाहिला. या काळात इ.स. ६१२ मध्ये सातव्या शतकातले प्रथम महाकुंभपर्व अलाहाबादला पार पडले होते. कुंभमेळ््यातील श्रद्धेचे वर्णन करताना ह्यू एन त्संग म्हणतो, ‘दोन नद्यांच्या संगमात स्नान केल्याने पाप धुतले जाते, तर कुंभपर्वात नदीला प्राण अर्पण केल्याने माणूस सरळ स्वर्गात जन्म घेतो, अशी यात्रेकरूंची श्रद्धा होती.’ इ.स. १३३८ साली हरिद्वारला भरलेल्या कुंभमेळ््यात गंगास्नान करणाऱ्या यात्रेकरूंची तैमूरलिंगने अमानुषपणे कत्तल केली. त्यावेळी सहिष्णू स्वभावाच्या अहिंसक साधूंनाही हाती शस्त्र घेत तैमूरलिंगसोबत सामना करावा लागला. तेव्हापासून नागा साधूंमध्ये शस्त्रधारी आणि शास्त्रधारी असे दोन विभाग निर्माण झाले. अकबराच्या काळात पुन्हा कुंभमहोत्सवाला हिंदू आणि बौद्धधर्मीय यात्रेकरू मोठ्या संख्येने जमू लागले. अकबराने महामंत्री राजा जयसिंह याच्या मार्गदर्शनानुसार हरिद्वारमध्ये कुंभमेळ््यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या. इ.स. १६३0 सालच्या हरिद्वारच्या कुंभपर्वात बादशहा जहांगीर स्वत: उपस्थित राहिला होता. त्याने तेथे मोठा दानधर्म केल्याचा उल्लेख जहांगीरनामामध्ये आहे. इंग्रजकाळातही कुंभपरंपरेत खंड पडला नाही. उलट त्यांनी हरिद्वारसारख्या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या. दीडशे वर्षांपूर्वी अलाहाबाद कुंभमेळ््याबाबत जे. सी. डेव्हिडसन याने १८४३ साली प्रकाशित केलेल्या ‘डायरी आॅफ ए ट्राइबल इन अपर इंडिया’ या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. दुसऱ्या महायुद्वाच्या काळात इंग्रज सरकारने हरिद्वारच्या कुंभमेळ््यावर प्रथमच बंदी आणली होती. त्यावेळी साधू कमालीचे संतप्त झाले होते. शेवटी जनमतापुढे इंग्रज सरकारला नमते घ्यावे लागले होते. कुंभमेळ््याचा सोहळा पाहण्यासाठी महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.तंटेबखेडे, चेंगराचेंगरीकुंभपर्वात प्रथम स्नान करण्याच्या मानापमानावरून विविध पंथांच्या साधूंमध्ये अनेकदा संघर्ष उडाला आहे. 10/04/1760 रोजी बैरागी व गोसावींमध्ये झालेल्या संघर्षात २ हजार साधू आणि यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते. 1765 मध्ये गोसावी आणि निर्मल आखाड्यामध्ये झालेल्या वादात पाचशे गोसावी व साधू मारले गेले होते. १८७६ सालीही अशाच प्रकारे शेकडो साधू मारले होते.1926 साली भीमगौडाजवळचा पूल तुटून अनेक यात्रेकरू व साधू दगावले. १९३८ साली हरिद्वारला आग लागून अनेक यात्रेकरू मरण पावले. पूर्वीच्या काळात गंगाकिनारी असलेले ब्रम्हकुंड अतिशय अरुंद होते. 1820साली ब्रम्हकुंडावर स्रानासाठी जमलेल्या गर्दीत ४३0 यात्रेकरू चेंगरून मरण पावले तर १८६७ ला साथ पसरल्याने अनेक यात्रेकरू व साधू मृत्युमुखी पडले. 1950साली हरकी पौडी घाटावरील गर्दीत अनेक यात्रेकरू चेंगरून मेले. १९६८ साली अशाच प्रकारे कुशावर्त घाटावर चेंगराचेंगरी झाली.