शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहर-उपनगरातील कोळीवाडे, गावठाण सुरक्षित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:47 IST

मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक कोळीवाडे आणि गावठाणांच्या जागांवर झोपडपट्ट्या दाखविल्यामुळे सर्वच स्तरांवर तीव्र नाराजी पसरली होती.

मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक कोळीवाडे आणि गावठाणांच्या जागांवर झोपडपट्ट्या दाखविल्यामुळे सर्वच स्तरांवर तीव्र नाराजी पसरली होती. मात्र, गावठाण, कोळीवाडे, आदिवासी पाडे यांची हद्द अद्याप ठरलेली नाही. महसूल विभागाकडून यांच्या हद्दी निश्चित झाल्यानंतर, त्यांचा समावेश मुंबईच्या विकास आराखड्यात केला जाणार आहे. त्यामुळे सर्व कोळीवाडे, गावठाण आदिवासी पाडे हे सुरक्षित होणार असल्याचे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिका सभागृहात स्पष्ट केले.पालिका महासभेत विकास आराखड्यावर चर्चा करताना, सर्वपक्षीय सदस्यांनी कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांबाबत चिंता व्यक्त केली.मात्र, मुंबईचा विकास आराखडा हा पारदर्शक असून, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवीसंस्था यांच्याशी सुसंवाद साधून, यामध्ये बदल करण्यात आले असल्याचे अजय मेहता यांनी या वेळी स्पष्ट केले.अशी मिळतील परवडणारी घरे-राष्ट्रीय गृहधोरणानुसार एका माणसाचा पाच वर्षांचा पगार लक्षात घेऊन, परवडणाºया घरांच्या किमती ठरवता येऊ शकतात. मुंबईतील ६५ टक्के जनता मासिक २० हजारपेक्षा अधिक पगार घेते. त्यामुळे नोकरदारांचा हा पगार गृहीत धरल्यास, किमान १२ ते १४ लाखांमध्ये मुंबईकरांना परवडणारी घरे ही या विकास आराखड्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातील, असे मेहता यांनी स्पष्ट केले. परवडणाºया किमतीत ही घरे देतानाच, त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाईल आणि यातून निर्माण होणारा महसूल याच वसाहतींच्या पायाभूत सेवा-सुविधांवर खर्च केला जाईल, असेही त्यांनी सांगितलेअंमलबजावणीसाठी हवे९० हजार कोटीएकूणच हा विकास करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची गरज आहे, परंतु यातील काही आरक्षित भूखंड आणि विकास नियंत्रण नियमावलीनुसार प्राप्त होणारा महसूल विचारात घेता, सुमारे ९० हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ४ ते ५ हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षांत दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले.तीन वर्षांच्या विलंबानंतर विकास आराखडा मंजूरमुंबईच्या विकासाचे नियोजन व दिशा ठरविणाºया २०१४- २०३४ या २० वर्षांच्या विकास आराखड्याला (डीपी प्लान) सोमवारी मध्यरात्री महापालिकेच्या महासभेत मंजुरी दिली. मात्र, आरे कॉलनीत मेट्रो रेल्वेच्या कारशेडचे आरक्षण विकास आराखड्यातून वगळले आहे. काँग्रेस व मनसेच्या मदतीने हे आरक्षण रद्द करीत, शिवसेनेने भाजपाच्या प्रकल्पाला सुरुंग लावला, परंतु या आराखड्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असल्याने, मेट्रोला पुन्हा रुळावर आणण्याचा मार्ग भाजपासाठी खुला आहे.