शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

शहर-उपनगरातील कोळीवाडे, गावठाण सुरक्षित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:47 IST

मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक कोळीवाडे आणि गावठाणांच्या जागांवर झोपडपट्ट्या दाखविल्यामुळे सर्वच स्तरांवर तीव्र नाराजी पसरली होती.

मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्यात अनेक कोळीवाडे आणि गावठाणांच्या जागांवर झोपडपट्ट्या दाखविल्यामुळे सर्वच स्तरांवर तीव्र नाराजी पसरली होती. मात्र, गावठाण, कोळीवाडे, आदिवासी पाडे यांची हद्द अद्याप ठरलेली नाही. महसूल विभागाकडून यांच्या हद्दी निश्चित झाल्यानंतर, त्यांचा समावेश मुंबईच्या विकास आराखड्यात केला जाणार आहे. त्यामुळे सर्व कोळीवाडे, गावठाण आदिवासी पाडे हे सुरक्षित होणार असल्याचे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिका सभागृहात स्पष्ट केले.पालिका महासभेत विकास आराखड्यावर चर्चा करताना, सर्वपक्षीय सदस्यांनी कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांबाबत चिंता व्यक्त केली.मात्र, मुंबईचा विकास आराखडा हा पारदर्शक असून, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवीसंस्था यांच्याशी सुसंवाद साधून, यामध्ये बदल करण्यात आले असल्याचे अजय मेहता यांनी या वेळी स्पष्ट केले.अशी मिळतील परवडणारी घरे-राष्ट्रीय गृहधोरणानुसार एका माणसाचा पाच वर्षांचा पगार लक्षात घेऊन, परवडणाºया घरांच्या किमती ठरवता येऊ शकतात. मुंबईतील ६५ टक्के जनता मासिक २० हजारपेक्षा अधिक पगार घेते. त्यामुळे नोकरदारांचा हा पगार गृहीत धरल्यास, किमान १२ ते १४ लाखांमध्ये मुंबईकरांना परवडणारी घरे ही या विकास आराखड्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातील, असे मेहता यांनी स्पष्ट केले. परवडणाºया किमतीत ही घरे देतानाच, त्यांची लॉटरी पद्धतीने विक्री केली जाईल आणि यातून निर्माण होणारा महसूल याच वसाहतींच्या पायाभूत सेवा-सुविधांवर खर्च केला जाईल, असेही त्यांनी सांगितलेअंमलबजावणीसाठी हवे९० हजार कोटीएकूणच हा विकास करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांची गरज आहे, परंतु यातील काही आरक्षित भूखंड आणि विकास नियंत्रण नियमावलीनुसार प्राप्त होणारा महसूल विचारात घेता, सुमारे ९० हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ४ ते ५ हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षांत दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले.तीन वर्षांच्या विलंबानंतर विकास आराखडा मंजूरमुंबईच्या विकासाचे नियोजन व दिशा ठरविणाºया २०१४- २०३४ या २० वर्षांच्या विकास आराखड्याला (डीपी प्लान) सोमवारी मध्यरात्री महापालिकेच्या महासभेत मंजुरी दिली. मात्र, आरे कॉलनीत मेट्रो रेल्वेच्या कारशेडचे आरक्षण विकास आराखड्यातून वगळले आहे. काँग्रेस व मनसेच्या मदतीने हे आरक्षण रद्द करीत, शिवसेनेने भाजपाच्या प्रकल्पाला सुरुंग लावला, परंतु या आराखड्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असल्याने, मेट्रोला पुन्हा रुळावर आणण्याचा मार्ग भाजपासाठी खुला आहे.