शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

कोल्हे दाम्पत्य खरे आम आदमी -प्रकाश आमटे

By admin | Updated: May 15, 2014 02:54 IST

गरजवंतांची गरज निर्माण होण्याआधी ती पूर्ण करणे हे खरे समाजकार्य. हे काम डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याने केले आहे.

पुणे : गरजवंतांची गरज निर्माण होण्याआधी ती पूर्ण करणे हे खरे समाजकार्य. हे काम डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याने केले आहे. आपल्या गरजा कमीत कमी करत त्यांनी मेळघाटातील आदिवासींमध्ये जगून दाखवले आहे. ते खरे आम आदमी आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे बुधवारी काढले. मृणालिनी चितळे लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मेळघाटावरील मोहोर-डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता’च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. आमटे म्हणाले, ‘डॉक्टर झाल्यावर इतक्या साधेपणाने सामाजिक कार्याची उर्मी असणे आणि त्याचा कसलाही पश्चाताप होऊ न देणे हा खरा समाजसेवेचा ध्यास झाला. या दोघांनीही अनेकांकडून प्रेरणा घेतली, पण काम मात्र आपल्या पद्धतीने, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केले. त्यांनी गीतेचा कर्मवाद आचरणात आणला आहे. त्याग, सेवा, संघर्ष यांचा संगम असणारे हे जोडपे आहे. त्यांच्या कार्याबद्दल सांगणार्‍या या पुस्तकाने प्रत्यक्ष कामाची किंवा निदान स्वत:च्या गरजा कमी करण्याची तरी प्रेरणा मिळेल.’ (प्रतिनिधी)