शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

कोल्हे दाम्पत्य खरे आम आदमी -प्रकाश आमटे

By admin | Updated: May 15, 2014 02:54 IST

गरजवंतांची गरज निर्माण होण्याआधी ती पूर्ण करणे हे खरे समाजकार्य. हे काम डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याने केले आहे.

पुणे : गरजवंतांची गरज निर्माण होण्याआधी ती पूर्ण करणे हे खरे समाजकार्य. हे काम डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याने केले आहे. आपल्या गरजा कमीत कमी करत त्यांनी मेळघाटातील आदिवासींमध्ये जगून दाखवले आहे. ते खरे आम आदमी आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे बुधवारी काढले. मृणालिनी चितळे लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘मेळघाटावरील मोहोर-डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता’च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. आमटे म्हणाले, ‘डॉक्टर झाल्यावर इतक्या साधेपणाने सामाजिक कार्याची उर्मी असणे आणि त्याचा कसलाही पश्चाताप होऊ न देणे हा खरा समाजसेवेचा ध्यास झाला. या दोघांनीही अनेकांकडून प्रेरणा घेतली, पण काम मात्र आपल्या पद्धतीने, आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून केले. त्यांनी गीतेचा कर्मवाद आचरणात आणला आहे. त्याग, सेवा, संघर्ष यांचा संगम असणारे हे जोडपे आहे. त्यांच्या कार्याबद्दल सांगणार्‍या या पुस्तकाने प्रत्यक्ष कामाची किंवा निदान स्वत:च्या गरजा कमी करण्याची तरी प्रेरणा मिळेल.’ (प्रतिनिधी)