शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

कोल्हापूर, सांगलीत छापे

By admin | Updated: October 23, 2016 00:54 IST

साखर वाहतुकीत घोटाळा : रेल्वेला कोट्यवधीचा गंडा; सीबीआय पथकाकडून तपासणी

मिरज : रेल्वेद्वारे साखर वाहतुकीत कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने कोल्हापूर व सांगली येथील रेल्वे अधिकारी, कर्मचारी व मालवाहतूक ठेकेदारांच्या घरावर छापेटाकून तपासणी केली. सांगलीतील एका साखर कारखान्यास वाहतुकीसाठी नियमबाह्य सवलत देऊन रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने कागदपत्रे ताब्यात घेतली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची साखर रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येते. महिन्याला लाखो टन साखर देशभरात निर्यात होत असल्याने माल वाहतुकीपासून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. साखर वाहतुकीसाठी रेल्वेकडून साखर कारखान्यांना सवलत देण्यात येते. साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांना दरवर्षी वेगवेगळ्या टक्केवारीनुसार रेल्वेकडून वाहतूक दरात सवलत मिळते. मालवाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही साखर वाहतूकदारांना मालवाहतूक भाड्यात सवलत देण्यात येते. कोल्हापूर व सांगली रेल्वेस्थानकातील मालधक्क्यावरून दरमहा लाखो टन साखर निर्यात होते. तीन वर्षांपूर्वी सांगलीतून एका कारखान्याची साखर आसाम येथे पाठविण्यात आली. मालगाडीत साखर भरण्याची जबाबदारी कोल्हापुरातील राजू नामक ठेकेदाराकडे आहे. राजू याने संबंधित साखर कारखान्यास १० टक्के सवलत द्यावयाची असताना ३० टक्के सवलत दिली. २० टक्केजादा सवलत देण्यात आल्यामुळे रेल्वेचे सुमारे ९८ लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची तक्रार रेल्वे प्रशासनाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे केल्यानंतर पुणे येथील सीबीआयच्या पथकाने आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरातील ठेकेदार राजू, सांगलीत रेल्वे मालवाहतूक पर्यवेक्षक व लिपिकांच्या घरावर छापे टाकून तपासणी केली. छाप्यात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर सीबीआयकडून अपहाराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)ठेकेदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीची नोटीसरेल्वे प्रशासनाने ठेकेदार राजू व तत्कालीन मालवाहतूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यांनी कारखान्याशी संगनमत करून रेल्वेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. सांगलीतील संबंधित साखर कारखान्याचे अधिकारीही याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मालवाहतूक विभागाचे रेल्वे अधिकारी हिशेबातील चूक असल्याचे सांगून याप्रकरणी सारवासारव करीत आहेत.