शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोल्हापूर-राजापूर कनेक्शन!

By admin | Updated: January 13, 2015 00:16 IST

मध्य रेल्वेचा प्रस्ताव : नवीन अर्थसंकल्पात होणार नवीन नातं तयार

रत्नागिरी : कोल्हापूर ते राजापूर असा कोकण रेल्वेमार्गाला जोडणारा ११२ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग उभारण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. हे बोर्ड केंद्रीय रेल्वे मंत्रालयांतर्गत असून, प्रस्तावित नवीन मार्गासाठी ३,१६८.१० कोटी रुपये खर्र्च अपेक्षित आहे. याबाबत तपशीलवार चर्चा झाली असून, २१ फेबु्रवारी २०१५ रोजी संसद सभागृहात सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात हा प्रस्ताव समाविष्ट होण्याची शक्यता आहे. कऱ्हाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गाबाबत हालचाली सुरू असताना कोल्हापूर-राजापूर हा नवे रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्तावही मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. कोल्हापूर-राजापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोल्हापूर-कोकण अधिक जवळ येणार आहे, व्यावसायिक उलाढाल वाढणार आहे. कोल्हापुरातून थेट जयगड बंदरापर्यंत कारखान्यांमधील साखर, इचलकरंजीतील गारमेंट यांची वाहतूक करणेही सोपे जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता एस. पी. म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांनाही माहिती दिली आहे. त्यानुसार या प्रस्तावात प्रकल्पासाठी अर्थपुरवठा कसा होईल, त्यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभाचा परतावा कसा असेल, याबाबत विविध स्तरावर कशी चर्चा झाली आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे. या प्रस्तावित कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर-जयगड बंदर (रत्नागिरी) हे कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील अनेक साखर कारखान्यांतील साखर, धान्य वाहतूक थेट जयगड बंदरापर्यंत शक्य होणार आहे. इचलकरंजी येथील कापड निर्मिती उद्योगालाही याचा लाभ होणार आहे. इचलकरंजीत जागतिक मानांकनप्राप्त ५० गारमेंट कंपन्या असून, कापड उत्पादक व कापड व्यापारीही मोठ्या प्रमाणात आहेत. (प्रतिनिधी)