शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोल्हापूर-राजापूर कनेक्शन!

By admin | Updated: January 13, 2015 00:16 IST

मध्य रेल्वेचा प्रस्ताव : नवीन अर्थसंकल्पात होणार नवीन नातं तयार

रत्नागिरी : कोल्हापूर ते राजापूर असा कोकण रेल्वेमार्गाला जोडणारा ११२ किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग उभारण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. हे बोर्ड केंद्रीय रेल्वे मंत्रालयांतर्गत असून, प्रस्तावित नवीन मार्गासाठी ३,१६८.१० कोटी रुपये खर्र्च अपेक्षित आहे. याबाबत तपशीलवार चर्चा झाली असून, २१ फेबु्रवारी २०१५ रोजी संसद सभागृहात सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात हा प्रस्ताव समाविष्ट होण्याची शक्यता आहे. कऱ्हाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गाबाबत हालचाली सुरू असताना कोल्हापूर-राजापूर हा नवे रेल्वेमार्ग अस्तित्वात येण्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्तावही मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. कोल्हापूर-राजापूर प्रस्तावित रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोल्हापूर-कोकण अधिक जवळ येणार आहे, व्यावसायिक उलाढाल वाढणार आहे. कोल्हापुरातून थेट जयगड बंदरापर्यंत कारखान्यांमधील साखर, इचलकरंजीतील गारमेंट यांची वाहतूक करणेही सोपे जाणार आहे. या प्रस्तावाबाबत पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता एस. पी. म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांनाही माहिती दिली आहे. त्यानुसार या प्रस्तावात प्रकल्पासाठी अर्थपुरवठा कसा होईल, त्यातील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभाचा परतावा कसा असेल, याबाबत विविध स्तरावर कशी चर्चा झाली आहे, याचीही माहिती देण्यात आली आहे. या प्रस्तावित कोल्हापूर-राजापूर रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर-जयगड बंदर (रत्नागिरी) हे कोकण रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील अनेक साखर कारखान्यांतील साखर, धान्य वाहतूक थेट जयगड बंदरापर्यंत शक्य होणार आहे. इचलकरंजी येथील कापड निर्मिती उद्योगालाही याचा लाभ होणार आहे. इचलकरंजीत जागतिक मानांकनप्राप्त ५० गारमेंट कंपन्या असून, कापड उत्पादक व कापड व्यापारीही मोठ्या प्रमाणात आहेत. (प्रतिनिधी)