शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोकाकोला, रिफायनरीत हजारोंना रोजगार!

By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST

रत्नागिरी : भविष्यात येणाऱ्या अनेक उद्योगांमुळे जिल्हा बनणार उद्योगनगरी...

रत्नागिरी : जिल्ह्यात येत्या काही वर्षात अनेक मोठे उद्योग येणार आहेत. गुहागरमध्ये रिफायनरी, हर्मन फिनोकेम, हिंदुस्थान पेपर कार्पाेरेशनसारख्या कंपन्या जिल्ह्यात येणार असतानाच आता कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिका भेटीत स्वाक्षरीही केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या या उद्योगांचे स्वागत नक्कीच होईल, परंतु या उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध होणे आवश्यक असूून, त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाणारे बेरोजगारांचे लोंढे कमी होण्यास मदत होईल, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. लोटे येथे होणाऱ्या कोकाकोलाच्या प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या आहेत. या ठिकाणी कोयनेचे अवजल आहे. कोकण रेल्वे मार्ग जवळ आहे. आवश्यकतेनुसार दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य आहे. चिपळूण रेल्वेस्थानकही प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे व सहज शक्य होणारे आहे. या पार्श्वभूमीवर कोकाकोलाचा प्रकल्प येथे उभारला जाणार हे आता निश्चित झाले आहे. कोकाकोलाप्रमाणेच जिल्ह्यात गुहागर तवसाळ येथे बीपीसीएल व इंडियन आॅईल कंपन्यांमार्फत संयुुक्तपणे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे असून, दोन्ही टप्पे प्रत्येकी २२ हजार कोटींचे आहेत. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक जिल्ह्यात या उद्योगाच्या रुपाने होणार आहे. प्रकल्पाचे काम ३ ते ४ वर्षे चालणार आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणी सुरू असताना येथे १५ ते २० हजार कर्मचारी लागणार आहेत. प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर ५ हजार कायम कामगार लागणार आहेत. येणाऱ्या या व अन्य प्रकल्पांतील कामगारांची, रोजगाराची क्षमता मोठी आहे. त्यातील किमान ५० टक्के रोजगार हा प्रकल्पग्रस्त व जिल्ह्यातील बेरोेजगारांना मिळाला पाहिजे, यासाठी आतापासूनच येथील संस्थांनी, राजकीय नेत्यांनी आवश्यक रणनीती आखून बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल, यासाठी सतर्क राहिले पाहिजे. (प्रतिनिधी)कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार.प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या.दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य.कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे.