शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचीच हत्या

By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत समीर गायकवाड या एकाच संशयिताला अटक झाली आहे़ त्यानंतर तपासाला विरामचिन्ह लावण्यात आले आहे. यावरून सरकार या हत्यांंचा तपास गांभीर्याने करत नाही, असा आरोप हमीद दाभोलकर यांनी केला़हमीद दाभोलकर म्हणाले, सीबीआय व सरकार यांसारख्या सर्वोच्च यंत्रणा गांभीर्याने काम करीत नाहीत. सध्याचे शासन समाजात बदलाचे आश्वासन देऊन सत्तेत आले आहे; परंतु कोणतेही चांगले बदल झालेले नाहीत. उलट या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फ्रान्समधील हल्ल्याचे मारेकरी दोन दिवसांत सापडले. परंतु येथे दोन-अडीच वर्षांपासून दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत. शैला दाभोलकर म्हणाल्या, दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला सरकारमुळे गती येत नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. या चळवळीला नागरिकांची हवी तेवढी साथ अद्याप मिळालेली नाही. तरुण वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला तर यंत्रणेवर नक्कीच दबाव निर्माण होईल. (प्रतिनिधी)वर्षभरात मोदींची नाही मिळाली वेळडॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करीत आहे़ मात्र, एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनही वेळ मिळालेली नाही़ यावरून दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येते, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले़