शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पावसामुळे निवड चाचणी स्पर्धेला ‘खो’

By admin | Updated: September 25, 2016 00:40 IST

सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की

मुंबई : सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की ठाणे खो-खो संघटनेवर ओढवली. परिणामी, संघटनेने २५ आॅक्टोबर रोजी नवी मुंबई, ऐरोली सेक्टर १६ येथील राधिकाबाई मेघे विद्यालय, विहंग क्रीडा मंडळात सकाळी ९ वाजता जिल्हा संघाची निवड चाचणी आयोजित केली आहे, अशी माहिती दिली.ठाणे जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आणि खो-खो निवड चाचणी स्पर्धा यांमधून जिल्हा संघाची निवड करण्यात येते. मात्र सतत पडणाऱ्या पावासामुळे खो-खो स्पर्धांचे आयोजन शक्य नसल्याचे संघटनेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पावसात स्पर्धा घेतल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड चाचणी स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे संघटनचे म्हणणे आहे. याचा फटका अहमदनगर येथे होणाऱ्या कुमार-कुमारी (१८ वर्षांखालील) खो-खो स्पर्धेलाही बसला आहे. परिणामी, पुरुष-महिला आणि कुमार-कुमारी या निवड चाचणी ऐरोली येथील विहंग क्रीडा मंडळात पार पडणार असल्याने पावसामुळे चक्क निवड चाचणी स्पर्धेलाच ‘खो’ मिळाल्याचे दिसून आले. ठाणे संघ निवडण्यासाठी मागील वर्षीच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत सहभागी खेळाडूंचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली. (क्रीडा प्रतिनिधी)