शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

पावसामुळे निवड चाचणी स्पर्धेला ‘खो’

By admin | Updated: September 25, 2016 00:40 IST

सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की

मुंबई : सांगली येथे होणाऱ्या (६ ते ९ आॅक्टोबर) खो-खो राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे संघ पाठवण्यात येणार आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे निवड चाचणी स्पर्धा रद्द करण्याची नामुश्की ठाणे खो-खो संघटनेवर ओढवली. परिणामी, संघटनेने २५ आॅक्टोबर रोजी नवी मुंबई, ऐरोली सेक्टर १६ येथील राधिकाबाई मेघे विद्यालय, विहंग क्रीडा मंडळात सकाळी ९ वाजता जिल्हा संघाची निवड चाचणी आयोजित केली आहे, अशी माहिती दिली.ठाणे जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा आणि खो-खो निवड चाचणी स्पर्धा यांमधून जिल्हा संघाची निवड करण्यात येते. मात्र सतत पडणाऱ्या पावासामुळे खो-खो स्पर्धांचे आयोजन शक्य नसल्याचे संघटनेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. पावसात स्पर्धा घेतल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड चाचणी स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे संघटनचे म्हणणे आहे. याचा फटका अहमदनगर येथे होणाऱ्या कुमार-कुमारी (१८ वर्षांखालील) खो-खो स्पर्धेलाही बसला आहे. परिणामी, पुरुष-महिला आणि कुमार-कुमारी या निवड चाचणी ऐरोली येथील विहंग क्रीडा मंडळात पार पडणार असल्याने पावसामुळे चक्क निवड चाचणी स्पर्धेलाच ‘खो’ मिळाल्याचे दिसून आले. ठाणे संघ निवडण्यासाठी मागील वर्षीच्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत सहभागी खेळाडूंचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली. (क्रीडा प्रतिनिधी)