शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

‘खरीप हंगाम संपला, पीककर्ज पुनर्गठनाचे काय?’

By admin | Updated: October 6, 2016 05:01 IST

२६ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षातील ४ लाख ४२ हजार ९०२ शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९८ कोटी रूपयांच्या पीक

मुंबई : २६ एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षातील ४ लाख ४२ हजार ९०२ शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या २४३८.९८ कोटी रूपयांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयानंतर सरकारने दोन महिने कोणताही पत्रव्यवहार केला नाही, मग कोणते पीक कर्ज पुनर्गठन केले गेले, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.माहिती अधिकारात उघड झालेली माहिती देताना सावंत म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दोन महिन्यांनी म्हणजे, १ जून २०१६ ला मुख्य सचिवांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना तर २ जून रोजी प्रधान सचिव यांनी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांना पत्र पाठवले. परंतु खरिपाचा हंगाम संपला तरी ना रिझर्व्ह बँकेने शासनाला पत्राचे उत्तर पाठवले, ना शासनातर्फे त्याचा पाठपुरावा करण्यात आला. सरकार केवळ मदतीचा देखावा करत आहे, असा आरोप करून सावंत म्हणाले, औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४९ हजार ५०० कोटी रूपयांच्या घोषणांची अतिवृष्टी करण्यात आली. मराठवाड्यातील जनतेला दाखवलेले हे दिवास्वप्न असून ही आकडेमोड केवळ जनतेचा असंतोष कमी करण्याकरिता होती.े मागील काही प्रकल्प, केंद्र सरकारच्या अखत्यारितील रस्त्यांचे प्रकल्प दाखवून आकडेवारी फुगवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)