शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

खडवली राया रस्ता गेला खड्ड्यात

By admin | Updated: August 24, 2016 15:37 IST

खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ऑनलाइन लोकमत

टिटवाळा, दि. २४ -  खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की, रोज येथे दोन तीन तरी छोटे मोठे अपघात घडत आहेत. यामुळे नागरिक व वाहन चालक यांच्यातून प्रशासनाविरूध नाराजीचा सूर निघत आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून केली जात आहे.कल्याण तालुक्यातील खडवली राया हा रस्ता महत्त्वाचा असून देखील या रस्त्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. या रस्त्यावरून लगतच्या 30 ते 40 गाव, खेड्या पाड्यातील नागरिक व वाहन चालक वाहतुकीसाठी वापरतात. तसेच या रस्त्यावर सततची रहदारी आहे. सदर रस्ता मुंबई नाशिक, कल्याण-नगर, कल्याण-पुणे या महामार्गांना जोडला जातो. यामुळे सहाजिकच हा रस्ता सतत वर्दळीच्या स्वरूपात दिसत आहे. परंतू आज मितीला या रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे पडले आहेत की, यामुळे या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी येथे वाहन चालवताना मोठीच कसरत करावी लागते. सदर रस्त्यावर वाहने चालविणार्‍या वाहन चालकांना पाठीच्या व मणक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या रस्त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी येथून करण्यात येत आहे