शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

खडसेंची भूखंड खरेदी अनधिकृतच!

By admin | Updated: July 20, 2016 06:21 IST

एमआयडीसीच्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांनी भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. शिवाय, हा खरेदी व्यवहार अनधिकृत असल्याने, सातबारा उताऱ्यावर संबंधितांची नावे चढविली जाणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या नावाने अनधिकृतपणे खरेदी केली आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारला होता. त्यावर ‘होय’ असे लेखी उत्तर उद्योगमंत्री देसाई यांनी दिले आहे. मात्र, विधान परिषदेत यावर चर्चा उपस्थित होताच या प्रकरणाची माजी न्यायमूर्ती डी. एस. झोटींग यांच्यामार्फत चौकशी सुरू असून सप्टेंबरमध्ये या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी सारवासारव देसाई यांनी केली.उद्योगमंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी उपप्रश्नाचा भडीमार केला. जमीन खरेदीचा व्यवहार अनधिकृत असेल तर मग संबंधितांवर गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? ज्या अधिका-यांनी या प्रकरणात खडसे यांना मदत केली त्यांच्यावर उद्योग विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न भाई जगताप यांच्यासह अन्य विरोधी सदस्यांनी केला. तर, दाऊद संभाषण प्रकरणाप्रमाणेच भोसरी येथील प्रकरणातही खडसेंना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर, सरकारच्या हेतूबाबत विरोधक शंका घेतात ते ठीक आहे. परंतु किमान माजी न्यायमूर्तींच्या चौकशीबाबत शंका नको, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सुनावले. या प्रकरणात तब्बल ६१ कोटी रुपये शासनाचे नुकसान झाले असून खडसे कुटुंबियांना त्याचा फायदा पोहचला आहे. जमीन खरेदीचे हे प्रकरण केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित नाही. कोट्यवधींचा महसूल यात बुडाला असून निवृत्त न्यायमूर्तींच्या चौकशीत आयकर, ईडीच्या अधिका-यांचा समावेश करण्यात यावा. अथवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी शरद रणपिसे यांनी केली. (प्रतिनिधी)>भाजपा मंत्र्यांचे मौनभोसरी जमीन खरेदी प्रकरणात विरोधी सदस्यांनी उद्योगमंत्र्यांची चांगलीच कोंडी केली. उद्योगमंत्र्यांवरील प्रश्नांच्या भडिमारात एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष्य होत होते, तरीही सभागृहात उपस्थित असलेले भाजपाचे मंत्री शांत बसून होते. एकाच प्रश्नाच्या उत्तरात मंत्री एका ठिकाणी गुन्ह्याची कबुली देतात आणि दुसरीकडे कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा करायला सांगतात. तुम्हाला अहवालच हवा होता, तर गुन्ह्याची कबुली का दिली, असा सवाल नारायण राणे यांनी केला.