शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

खडसेंची भूखंड खरेदी अनधिकृतच!

By admin | Updated: July 20, 2016 06:21 IST

एमआयडीसीच्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांनी भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. शिवाय, हा खरेदी व्यवहार अनधिकृत असल्याने, सातबारा उताऱ्यावर संबंधितांची नावे चढविली जाणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या नावाने अनधिकृतपणे खरेदी केली आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारला होता. त्यावर ‘होय’ असे लेखी उत्तर उद्योगमंत्री देसाई यांनी दिले आहे. मात्र, विधान परिषदेत यावर चर्चा उपस्थित होताच या प्रकरणाची माजी न्यायमूर्ती डी. एस. झोटींग यांच्यामार्फत चौकशी सुरू असून सप्टेंबरमध्ये या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी सारवासारव देसाई यांनी केली.उद्योगमंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी उपप्रश्नाचा भडीमार केला. जमीन खरेदीचा व्यवहार अनधिकृत असेल तर मग संबंधितांवर गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? ज्या अधिका-यांनी या प्रकरणात खडसे यांना मदत केली त्यांच्यावर उद्योग विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न भाई जगताप यांच्यासह अन्य विरोधी सदस्यांनी केला. तर, दाऊद संभाषण प्रकरणाप्रमाणेच भोसरी येथील प्रकरणातही खडसेंना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर, सरकारच्या हेतूबाबत विरोधक शंका घेतात ते ठीक आहे. परंतु किमान माजी न्यायमूर्तींच्या चौकशीबाबत शंका नको, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सुनावले. या प्रकरणात तब्बल ६१ कोटी रुपये शासनाचे नुकसान झाले असून खडसे कुटुंबियांना त्याचा फायदा पोहचला आहे. जमीन खरेदीचे हे प्रकरण केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित नाही. कोट्यवधींचा महसूल यात बुडाला असून निवृत्त न्यायमूर्तींच्या चौकशीत आयकर, ईडीच्या अधिका-यांचा समावेश करण्यात यावा. अथवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी शरद रणपिसे यांनी केली. (प्रतिनिधी)>भाजपा मंत्र्यांचे मौनभोसरी जमीन खरेदी प्रकरणात विरोधी सदस्यांनी उद्योगमंत्र्यांची चांगलीच कोंडी केली. उद्योगमंत्र्यांवरील प्रश्नांच्या भडिमारात एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष्य होत होते, तरीही सभागृहात उपस्थित असलेले भाजपाचे मंत्री शांत बसून होते. एकाच प्रश्नाच्या उत्तरात मंत्री एका ठिकाणी गुन्ह्याची कबुली देतात आणि दुसरीकडे कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा करायला सांगतात. तुम्हाला अहवालच हवा होता, तर गुन्ह्याची कबुली का दिली, असा सवाल नारायण राणे यांनी केला.