शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंची भूखंड खरेदी अनधिकृतच!

By admin | Updated: July 20, 2016 06:21 IST

एमआयडीसीच्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांनी भोसरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या ताब्यातील जमीन खरेदीचा केलेला व्यवहार अनधिकृत असल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. शिवाय, हा खरेदी व्यवहार अनधिकृत असल्याने, सातबारा उताऱ्यावर संबंधितांची नावे चढविली जाणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या नावाने अनधिकृतपणे खरेदी केली आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारला होता. त्यावर ‘होय’ असे लेखी उत्तर उद्योगमंत्री देसाई यांनी दिले आहे. मात्र, विधान परिषदेत यावर चर्चा उपस्थित होताच या प्रकरणाची माजी न्यायमूर्ती डी. एस. झोटींग यांच्यामार्फत चौकशी सुरू असून सप्टेंबरमध्ये या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी सारवासारव देसाई यांनी केली.उद्योगमंत्र्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी उपप्रश्नाचा भडीमार केला. जमीन खरेदीचा व्यवहार अनधिकृत असेल तर मग संबंधितांवर गुन्हे दाखल का करण्यात आले नाही? ज्या अधिका-यांनी या प्रकरणात खडसे यांना मदत केली त्यांच्यावर उद्योग विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न भाई जगताप यांच्यासह अन्य विरोधी सदस्यांनी केला. तर, दाऊद संभाषण प्रकरणाप्रमाणेच भोसरी येथील प्रकरणातही खडसेंना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सरकारकडून चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर, सरकारच्या हेतूबाबत विरोधक शंका घेतात ते ठीक आहे. परंतु किमान माजी न्यायमूर्तींच्या चौकशीबाबत शंका नको, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सुनावले. या प्रकरणात तब्बल ६१ कोटी रुपये शासनाचे नुकसान झाले असून खडसे कुटुंबियांना त्याचा फायदा पोहचला आहे. जमीन खरेदीचे हे प्रकरण केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित नाही. कोट्यवधींचा महसूल यात बुडाला असून निवृत्त न्यायमूर्तींच्या चौकशीत आयकर, ईडीच्या अधिका-यांचा समावेश करण्यात यावा. अथवा हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी शरद रणपिसे यांनी केली. (प्रतिनिधी)>भाजपा मंत्र्यांचे मौनभोसरी जमीन खरेदी प्रकरणात विरोधी सदस्यांनी उद्योगमंत्र्यांची चांगलीच कोंडी केली. उद्योगमंत्र्यांवरील प्रश्नांच्या भडिमारात एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष्य होत होते, तरीही सभागृहात उपस्थित असलेले भाजपाचे मंत्री शांत बसून होते. एकाच प्रश्नाच्या उत्तरात मंत्री एका ठिकाणी गुन्ह्याची कबुली देतात आणि दुसरीकडे कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा करायला सांगतात. तुम्हाला अहवालच हवा होता, तर गुन्ह्याची कबुली का दिली, असा सवाल नारायण राणे यांनी केला.