शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

खड्डे नागरिकांचीही जबाबदारी -महापौर

By admin | Updated: July 13, 2016 04:19 IST

अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मुंबई : अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईत ६६ खड्डे असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले़ विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीमच सुरू केली़ मात्र विरोधी पक्षांऐवजी सध्या मित्रपक्षच शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरले आहे़ शिवसेनेला मित्रपक्ष भाजपानेच आज खड्ड्यांचे दर्शन घडविले़ खड्ड्यांवरून वातावरण तापत असताना त्याला समर्पक उत्तर देण्याऐवजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे़ तक्रार करण्यापूर्वी तो रस्ता कोणाचा आहे, याची माहिती असावी, असे वादग्रस्त विधान करत त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता कोणाचा त्या यंत्रणेचे नावही त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितले़ तसेच भाजपा नेत्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांची दखल घेणार, असा बचाव करीत आंबेकर यांनी युतीतील वादावर पांघरुण घातले़ (प्रतिनिधी)पायधुनी विभागात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी या आज त्यांच्या विभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या असता रहमतुल्ला मार्गावरील एका खड्ड्यात त्यांचा पाय गेला व त्या पडल्या़ यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर जे़जे़ रुग्णालयात उपचार करण्यात आले़काँग्रेसने आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पॉटहोल दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार १५ जुलै रोजी ११ वाजता फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय असा दिंडीचा प्रवास असेल.