शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

कायस्थ प्रभू फूड फेस्टिव्हलमध्येच अडकून पडलेत

By admin | Updated: July 12, 2017 03:44 IST

कायस्थांचा इतिहास लेखणी आणि तलवार दोन्ही सांभाळण्याचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कायस्थांचा इतिहास लेखणी आणि तलवार दोन्ही सांभाळण्याचा आहे. कायस्थांचे खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परंतु अलीकडे केवळ खाद्यसंस्कृती व फूड फेस्टिव्हल यामध्ये आपली ज्ञाती अडकून पडली आहे. कायस्थांच्या खाद्यसंस्कृतीबरोबरच स्वामीनिष्ठेचा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास संशोधिका व गडदुर्गाच्या अभ्यासक शिल्पा प्रधान यांनी केले.सीकेपी संस्था, कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एका विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधान बोलत होत्या. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुर्वेदाचार्य डॉ. भाऊ सुळे, संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे इत्यादी उपस्थित होते.प्रधान म्हणाल्या, बाजी यांचे आडनाव प्रधान होते. देशपांडे ही त्यांना सनद मिळाली होती. त्या काळी कायस्थ हे प्रभू नावाने ओळखले जात असत म्हणून बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू छत्रपतीकडे चाकर नव्हते तर ते बादलांचे सेनापती होते. एका लढाईत बादल लोकांनी छत्रपतींसाठी मोठा पराक्रम केला होता व तो छत्रपतींच्या कानी गेला. जेव्हा पन्हाळ्याला वेढा पडला तेव्हा पाऊस सुरु झाल्यानंतर हा वेढा सुटेल, असा छत्रपतींचा कयास होता. परंतु साठ हजार सैन्यानिशी आलेल्या मोगलांनी वेढा तसाच ठेवला. त्यानंतर बादलांच्या मदतीने पन्हाळगडावरु न निसटण्याची योजना छत्रपतींनी आखली. त्यावेळी बाजीप्रभूंनी सुमारे एक हजार बादल सैनिकांना बोलावले आणि त्यातील ६०० सैनिकांची निवड छत्रपतींबरोबर निसटण्यासाठी केली. त्यानंतर पन्हाळगड ते विशाळगड असा घोडखिंडीतील प्रवास सुरु झाला. आजही या रस्त्याने जातांना सुमारे सोळा तास लागतात. त्यावेळेस आषाढातील पाऊस, चिखलातून महाराज आणि त्यांच्या मावळयांनी कसे कसे मार्गक्रमण केले हे त्यांनी सांगितले.छत्रपतींनी पन्हाळयावरुन विशाळगडाचा मार्ग का निवडला, सुखरूप असलेल्या कोकणात ते का गेले नाही याविषयी सांगताना प्रधान म्हणाल्या की, छत्रपतींची दहा लग्ने झाली होती. पन्हाळा ते विशाळगड हा मोरे यांचा मुलुख होता. सर्व मोरे मोगलांचे सेवक होते. छत्रपती कुणबी मराठा होते आणि हे मोरे राव मराठा होते. त्यामुळे त्यांनी छत्रपतींशी जमवून घेतले नाही. परंतु विशाळगडावरील मोऱ्यांनी रोटी बेटीचा व्यवहार करून छत्रपतींशी जमवून घेतले. त्यांची मुलगी छत्रपतींची चौथी पत्नी होती. जावयाचा आदरसत्कार आपली जुनी परंपरा आहे म्हणूनच महाराजांनी विशाळगडाची निवड केली. >बाजीप्रभूंचे हे शौर्य सांगायला हवे बाजीप्रभूंबरोबर घोडखिंडीमध्ये अवघे तीनशे मावळे होते. समोर मोगलांचे साडेचार हजार सैनिक होते. आपल्या मावळयांना दहा दहाच्या गटाने विखरु न ठेवत ज्या पध्दतीने बाजीप्रभूंनी मोगलांवर चढाई केली त्यावरु न छत्रपतींसह असंख्य मावळे घोडखिंडीतच आहेत, असा मोगलांचा समज झाला. जेव्हा प्रत्यक्ष मोगल सैन्य समोरासमोर आले तेव्हा आपल्या दांडपट्ट्याने अनेक मोगल सैनिकांना बाजीप्रभूंनी कापून काढले. प्रचंड शक्तीचा हा सेनापती सहजासहजी आपल्या हाती पडणार नाही हे ओळखून मोगल सैनिकांनी आणखी कुमक मागवली आणि डोंगरावरुन चारही बाजूकडून बाजीप्रभूंवर ठासणीच्या बंदुकीने हल्ले चढवले यात बाजीप्रभूंचा डावा हात कोपरापासून निखळला. तरीही त्यांनी उजव्या हाताने दांडपट्टा सुरु च ठेवला होता. अखेर बाजीप्रभू धारातिर्थी पडले. तत्पूर्वी छत्रपती सुखरु प पोहचल्याची खबर गुप्तहेरांकडून बाजीप्रभूंना समजली होती. आपला हेतू साध्य झाला याचे त्यांना समाधान वाटले. मराठा सैन्याला जंगलात पळून जाण्यास सांगून ते स्वत: आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू हे दोघेच त्या रणसंग्रामावर लढत राहिले. छत्रपती विशाळगडावर पोहचल्याचे समजताच मोगल सैन्य मागे फिरले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या देहाची चाळण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले, असे प्रधान म्हणाल्या.>बाजीप्रभू चौकाचे सुशोभिकरण करणारडोंबिवलीतील बाजीप्रभू देशपांडे चौकाचे तसेच अंबरनाथ शिवमंदिर येथील बाजीप्रभू रस्त्याचे सुशोभिकरण खासदार निधीतून करण्याची घोषणा यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. सीकेपी संस्थेच्या मंडळींनी त्यासाठी योजना तयार करावी. त्यांच्या देखरेखीखाली आपण हे काम करू, असे त्यांनी सांगितले.