शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘पॅरेंटिंग प्लॅन’मधून वाचणार कोवळे बालपण

By admin | Updated: June 9, 2015 06:08 IST

मुलांचे कोवळे बालपण वाचविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कौटुंबिक न्यायालयांना ‘पॅरेंटिंग प्लॅन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिनाकौसर खान-पिंजार, पुणेन्यायालयात आई-वडिलांचा घटस्फोटासाठी अर्ज गेला, की मुलांच्या ताब्याचा प्रश्न उपस्थित होतोच. घटस्फोटापेक्षा ही मुले कोणाकडे राहणार, यासाठी होणारी रस्सीखेच मुलांच्या मनावर ताण निर्माण करू लागते. परिणामी मुलांमध्ये आपण कोणालाच नको, अशी असुरक्षितेची भावना बळावू लागते. घटस्फोट पती-पत्नींमध्ये होणार असला, तरी आई-वडील म्हणून त्याचा दूरगामी परिणाम मुलांवर होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुलांचे कोवळे बालपण वाचविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कौटुंबिक न्यायालयांना ‘पॅरेंटिंग प्लॅन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळावा म्हणून दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पती-पत्नींतील वादांबरोबरच मुलाचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून भांडणाऱ्या आई-वडिलांच्या खटल्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालकांचा घटस्फोट ही बाबच मुलांसाठी अवघड असते. त्यातच त्यांचा ताबा कोणाकडे राहणार, यावरून पालक मुलांचा विचार न करता भांडभांड भांडत असतात. आई-वडिलांचा घटस्फोट पचविणे आणि त्यातूनच आपण कोणा एकाकडेच राहायला जाणे या दोन्ही गोष्टी हाताळणे नकळत्या मुलांसाठी अतिशय अवघड असते. त्यामुळे मुलांना समजून घेणाऱ्या या पॅरेंटिंग प्लॅनची कल्पना अस्तित्वात आली. मात्र, अद्याप राज्यातील बहुतांश पक्षकार या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. परदेशात मात्र अशा प्रकारचे पॅरेंटिंग प्लॅन मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. (प्रतिनिधी)काय आहे हा पॅरेंटिंग प्लॅनमुलांच्या भविष्यासाठी दोन्ही पालकांनी एकत्र यायचे. दोघांनी सामंजस्याने एकत्रित येऊन आपसातील वाद बाजूला ठेवून मुलांचा ताबा कधी कोणाकडे असेल, त्यांच्या देखभालीचा, आरोग्याचा, विम्याचा खर्च कोण करणार आहे याची जबाबदारी, अशा सर्व बाबींवर व्यवस्थित चर्चा करून एक आराखडा आखायचा. त्यानंतर उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या विहित नमुन्यानुसार हा पॅरेंटिंग प्लॅन न्यायालयापुढे दाखल करू शकतात. दाम्पत्यांनी सामंजस्याने आणि आपापली जबाबदारी घेऊन दोघांनी सादर केलेल्या प्लॅनचा न्यायालय अभ्यास करून मंजुरी देईल. सादर केलेल्या प्लॅनमधील बाबींचे पालन करण्याचे बंधन दोघांवर असते.

प्लॅनचे साध्य काय?मुळात आई-वडिलांमध्ये सुरू असलेल्या वादाचा परिणाम मुलांवर होऊ नये तसेच मुलांचे हक्क अबाधित राहावेत, त्यांना दोघांकडूनही प्रेम मिळावे. मुख्य म्हणजे आपण सुरक्षित आहोत, आपली काळजी घेतली जाते, अशी भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी पॅरेंटिंग प्लॅन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.