शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

धुळीत हरवला ‘कात्रज बायपास’

By admin | Updated: January 20, 2017 00:41 IST

कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला

पिसोळी : महापालिका हद्दीलगतच्या गावातून जाणारा कात्रज बायपास सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला आहे. खडीमशीन चौकाच्या बाजूने होत असलेले रस्त्याच्या एकबाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला उर्वरित एका बाजूचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.जुलै २०१६ मध्ये खडी मशीन चौक ते मंतरवाडीपर्यंतच्या कात्रज बायपासचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कामाचा मुहूर्त फार उशिरा लागला. काम जलदगतीने सुरुवात होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात झाले उलटेच, काम सुरू होऊन अडीच महिने होऊनही आजपर्यंत केवळ दीड दोन किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण झाला आहे.तसेच रस्त्याच्या ज्या एका बाजूने वाहतूक होत आहे, त्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे जड वाहतूक करण्याऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. पडलेल्या खड्ड्यांतून प्रचंड प्रमाणात धूळ उडते, ज्यामुळे बायपासच्या आजूबाजूचे रहिवासी, व्यावसायिक त्रस्त आहेत. बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांवर, घरांवर, फलकांवर धुळीचे थर साचले आहेत.तसेच हा रस्ता व त्याची देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने रस्ता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात आहे, त्यांना मूग गिळून गप्प बसावे लागत आहे. मागे एका ग्रामपंचायतच्या वतीने रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारांच्या नावाचे फलकच बायपास रस्त्यावर लावले होते. (वार्ताहर)>बांधकाम विभागाचे दुर्लक्षसिमेंट काँक्रिटीकरण चालू असलेल्या बाजूला आता उशिरा साइड रोड बनविण्याचे काम चालू केले आहे, ज्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरण झालेला भागही वाहतुकीस खुला करता येणार नाही. तसेच सिमेंट काँक्रिटीकरण न केलेल्या भागावर खड्डे बुजविण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. या सर्वाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.