शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य

By admin | Updated: August 16, 2015 00:19 IST

- स्नेहा मोरे, मुंबई येत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

- स्नेहा मोरे,  मुंबईयेत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. सत्ताबदल झाल्यानंतर काश्मीरप्रश्न लवकर सुटेल या पोकळ शक्यतेला प्रखर विरोध करीत आता काश्मीर कायम ‘शापित नंदनवन’ राहील, असेही ते म्हणाले.शिवाजी मंदिर येथे गुरुवारी भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आणि आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखत पार पडली. याप्रसंगी, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि द्वारकानाथ संझगिरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकार स्वानंद ओक यांनी दोन्ही दिग्गज साहित्यिकांना बोलते केले. याप्रसंगी, मराठी साहित्याच्या अनुषंगाने जागतिक स्तरावरील समस्या, मराठी साहित्याची सद्य:स्थिती, सावरकरवाद-गांधीवाद या विषयांवर दोन्ही साहित्यिकांनी परखड विचार व्यक्त केले. सत्ताबदल झाल्यानंतर जातींच्या अस्मिता दिवसेंदिवस डोकं वर काढत आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, आजमितीस जातीसंस्था उरलेली नाही, उरल्या आहेत त्या केवळ जातीय संघटना आहेत. या जातीय संघटनांचा वापर आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जातो आहे. केवळ मतांसाठी जातीचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत जनगणनेत ‘जाती’ची नोंद व्हावी, अशी चुकीची मागणी करण्यात येत आहे. तर सदानंद मोरे यांनी जातीसंस्था आता नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विचारांमध्ये बदल आणि भेदाभेद टाळण्याची गरज असल्याचे सांगितले.भारताने पुढील ५० वर्षांच्या वाटचालीत गांधींच्या मार्गाने जावे की सावरकरांच्या विचाराने यावर उत्तर देताना सदानंद मोरे म्हणाले की, गांधीवाद कोणत्याच राजकारण्यांना परवडण्यासारखा नाही. खुद्द नेहरूंनीही त्यापासून फारकत घेतली होती; आणि काँग्रेसवाल्यांनाही गांधीजींचे विचार कधीच पटले नाहीत. तर शेषराव मोरे म्हणाले की, गांधीवाद आणि सावरकरवाद आचरणात आणताना हा ‘वाद’ समजून घेतला पाहिजे. सावरकरांचे विचार अत्यंत आधुनिक होते, त्यांनी समाज हा केवळ बुद्धीवर घडतो धर्मावर नव्हे, असे सांगितले. गांधींनी समाज घडविताना धर्माचा आधार घेतला, असे मत शेषराव मोरे यांनी मांडले. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ला संकुचित मानणाऱ्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.फाळणी, हिंदू-मुस्लीम या मुद्द्यांपासून साहित्यिक अलिप्तसाहित्य समाजाला दिशा दाखविते असे म्हणतात. मात्र मराठी साहित्यात भारताची फाळणी असो वा हिंदू-मुस्लीम प्रश्न याबद्दल लिखाण झाले नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, देशाच्या समस्या आणि प्रश्न साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून सुटणारे नाहीत. अनेक वर्षांपासून आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनातही कधीच या विषयावर परिसंवाद झालेला नाही. हे विषय मराठी साहित्यात टाळले जातात, या विषयांवर लिखाण करायचे नाही हीच साहित्यिकांची भूमिका आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर मराठीतील साहित्यिक केवळ दु:ख व्यक्त करून थांबतात ही शोकांतिका आहे.‘धार्मिक भावना दुखावू नयेत’भारतासमोरील तालिबानी, इसिस यांसारख्या समस्यांवर गांधीमार्ग अवलंबला पाहिजे की सावरकरवाद याविषयी मते मांडताना शेषराव मोरे म्हणाले की, यासाठी सावरकरांच्या विचारमार्गाने घटनेत २५ वे कलम अंतर्भूत केले आहे. त्यामुळे सावरकरांनी अल्पसंख्याक समाजाला कधीच अंतर दिले नाही. तर धर्माविषयी कायदा करण्याचा शासनाला विचार का करावा लागतो? अशी परखड भूमिका मांडली. शासनच याविषयी तोडगा काढू शकते. त्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार भक्कम असले पाहिजे, असेही ते म्हणाले. तर सदानंद मोरे यांनी घटनेत धर्माला स्थान आहे, त्यामुळे या समस्यांना तोंड देताना सामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचा विचार करणे गरजेचे आहे, असे सांगितले.