शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य

By admin | Updated: August 16, 2015 00:19 IST

- स्नेहा मोरे, मुंबई येत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

- स्नेहा मोरे,  मुंबईयेत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. सत्ताबदल झाल्यानंतर काश्मीरप्रश्न लवकर सुटेल या पोकळ शक्यतेला प्रखर विरोध करीत आता काश्मीर कायम ‘शापित नंदनवन’ राहील, असेही ते म्हणाले.शिवाजी मंदिर येथे गुरुवारी भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आणि आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखत पार पडली. याप्रसंगी, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि द्वारकानाथ संझगिरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकार स्वानंद ओक यांनी दोन्ही दिग्गज साहित्यिकांना बोलते केले. याप्रसंगी, मराठी साहित्याच्या अनुषंगाने जागतिक स्तरावरील समस्या, मराठी साहित्याची सद्य:स्थिती, सावरकरवाद-गांधीवाद या विषयांवर दोन्ही साहित्यिकांनी परखड विचार व्यक्त केले. सत्ताबदल झाल्यानंतर जातींच्या अस्मिता दिवसेंदिवस डोकं वर काढत आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, आजमितीस जातीसंस्था उरलेली नाही, उरल्या आहेत त्या केवळ जातीय संघटना आहेत. या जातीय संघटनांचा वापर आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जातो आहे. केवळ मतांसाठी जातीचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत जनगणनेत ‘जाती’ची नोंद व्हावी, अशी चुकीची मागणी करण्यात येत आहे. तर सदानंद मोरे यांनी जातीसंस्था आता नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विचारांमध्ये बदल आणि भेदाभेद टाळण्याची गरज असल्याचे सांगितले.भारताने पुढील ५० वर्षांच्या वाटचालीत गांधींच्या मार्गाने जावे की सावरकरांच्या विचाराने यावर उत्तर देताना सदानंद मोरे म्हणाले की, गांधीवाद कोणत्याच राजकारण्यांना परवडण्यासारखा नाही. खुद्द नेहरूंनीही त्यापासून फारकत घेतली होती; आणि काँग्रेसवाल्यांनाही गांधीजींचे विचार कधीच पटले नाहीत. तर शेषराव मोरे म्हणाले की, गांधीवाद आणि सावरकरवाद आचरणात आणताना हा ‘वाद’ समजून घेतला पाहिजे. सावरकरांचे विचार अत्यंत आधुनिक होते, त्यांनी समाज हा केवळ बुद्धीवर घडतो धर्मावर नव्हे, असे सांगितले. गांधींनी समाज घडविताना धर्माचा आधार घेतला, असे मत शेषराव मोरे यांनी मांडले. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ला संकुचित मानणाऱ्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.फाळणी, हिंदू-मुस्लीम या मुद्द्यांपासून साहित्यिक अलिप्तसाहित्य समाजाला दिशा दाखविते असे म्हणतात. मात्र मराठी साहित्यात भारताची फाळणी असो वा हिंदू-मुस्लीम प्रश्न याबद्दल लिखाण झाले नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, देशाच्या समस्या आणि प्रश्न साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून सुटणारे नाहीत. अनेक वर्षांपासून आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनातही कधीच या विषयावर परिसंवाद झालेला नाही. हे विषय मराठी साहित्यात टाळले जातात, या विषयांवर लिखाण करायचे नाही हीच साहित्यिकांची भूमिका आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर मराठीतील साहित्यिक केवळ दु:ख व्यक्त करून थांबतात ही शोकांतिका आहे.‘धार्मिक भावना दुखावू नयेत’भारतासमोरील तालिबानी, इसिस यांसारख्या समस्यांवर गांधीमार्ग अवलंबला पाहिजे की सावरकरवाद याविषयी मते मांडताना शेषराव मोरे म्हणाले की, यासाठी सावरकरांच्या विचारमार्गाने घटनेत २५ वे कलम अंतर्भूत केले आहे. त्यामुळे सावरकरांनी अल्पसंख्याक समाजाला कधीच अंतर दिले नाही. तर धर्माविषयी कायदा करण्याचा शासनाला विचार का करावा लागतो? अशी परखड भूमिका मांडली. शासनच याविषयी तोडगा काढू शकते. त्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार भक्कम असले पाहिजे, असेही ते म्हणाले. तर सदानंद मोरे यांनी घटनेत धर्माला स्थान आहे, त्यामुळे या समस्यांना तोंड देताना सामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचा विचार करणे गरजेचे आहे, असे सांगितले.