शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

कसाराही ‘माळीण’च्या वाटेवर !

By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST

पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कसारा : पुणो जिल्ह्यातील ‘माळीण’ गावाची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कसारा येथे होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील संमिo्र लोकवस्ती असलेल्या कसारा गावाची लोकसंख्या कागदोपत्री 35 हजारावर असून तर विना कागदोपत्री गावाची लोकसंख्या सरासरी 55 हजारावर पोहचली आहे.  मुंबई, ठाणो, कल्याण या ठिकाणी नोकरीधंद्यासाठी जाण्यासाठी अग्रभागी असलेल्या कसारा गावात नगर, पुणो, 
नाशिक, जळगांव, भुसावळ, मनमाड, मालेगांव, धुळे, जालना यासह र}ागिरी, चिपळून या भागातील अनेकजण कसा:यात वर्षानुवर्षापासून वास्तव करीत आहेत.
सूपंर्ण परिसर वनविभाग व महसूलच्या ताब्यात असला तरी 75 टक्के वनविभाग तर 25 टक्के महसुली जमीन असलेल्या कसा:यात लोकांनी डोंगर टेकडय़ा पोखरून घरे बांधली. मराठा, आगरी, कोळी, ठाकूर, आदिवासी, दलित समाजाचे लोक या गावात वास्तव्यास आहेत. गावाच्या चारही बाजूस डोंगर टेकडय़ा असल्याने आपल्या सोनीनुसार लोकांनी घरे बांधलीत परिसरातील महात्मा फुलेनगर, तानाजी नगर, कोळीवाडा, आनंदनगर, मिलिंदनगर, देऊळवाडी, ठाकूरवाडी येथील डोंगर टेकडय़ांवर डोंगर पोखरून घरे बांधली. या घरांना वीज, पाणी, यासह सुविधा ग्रामपंचायत प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेनंतर मात्र यामध्ये भितीचे सावट आहे.
घरे बांधलीत त्याला काही धोका तर नाही ना? माळीण सदृश्य स्थिती आपणाकडे तर होणार नाही ना अशी भिती वाटणा:या ग्रामस्थांची झोप मात्र सध्या उडाली आहे. कसारा परिसरात सतत कोसळणा:या पाऊसामुळे शासकीय यंत्रणोने ही कसा:याकडे मोर्चा वळविला असून तहसील, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गावाचा सव्र्हे करित धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांना नोटीसा देत सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कसा:यातील कोळीवाडा -तानाजी नगर येथे 2क्क्8 साली डोंगरकडा कोसळून मोठय़ा प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.  परंतु त्यावेळी वस्ती कमी असल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र आजमितीस या कोसळलेल्या डोंगर कडय़ावर  शेकडो घरे उभी राहिली आहेत. या वस्ती लगतच 
मोठमोठे डोंगर आहेत. पाऊसामुळे अनेक डोंगरांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात डोंगर कोसळण्याची भीती आहे. डोंगर टेकडय़ांवर  वसलेल्या गोर गरीब जनतेच्या घ्ज्ञरांची व संबंधित डोंगर टेकडय़ांची भूगर्भतज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत असून माळीणच्या पाश्र्वभूमीवर कसा:यातील डोंगर टेकडय़ांवर  राहणा:या ग्रामस्थांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे काय नाही याचे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी शिवसेनेचे शहरसचिव र}ाकर लहाणो यांनी प्रशासनाकडे केली आहे. वनविभागाच्या जागेत 7क् टक्के लोकवस्ती आहे. शासनाने वर्षानुवष्रे वास्तव्यास असलेल्या या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून  आताच पाऊले उचलावीत अशी मागणी रहिवाशांकडून केली आहे.
 
धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतमार्फत नोटीस स्वरुपात सूचना देण्यात आल्या आहेत. रहिवाशींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज आहे.
- सुमन घारे, सरपंच कसारा, मोरपावणो ग्रा.प.
 
2क्क्8 मध्ये या ठिकाणी डोंगर कडा कोसळून जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक गाडय़ा अडकल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु यावेळी त्या ठिकाणी (डोंगरावर) वस्ती वाढल्याने सदर भाग संवेदनशील आहे.
- राजू आयरे, ग्रामस्थ, कोळीवाडा