शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का घसरला, कोल्हापूरमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

By admin | Updated: November 1, 2015 19:40 IST

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सुमारे ४५ टक्के तर कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली/कोल्हापूर, दि. १ - सत्ताधारी शिवसेना - भाजपामधील वाकयुद्धामुळे रंगलेली कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया रविवारी संध्याकाळी साडे पाच वाजता संपली. कल्याण डोंबिवलीत सुमारे  ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज असून कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरकरांनी मतदानाला भरभरुन प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेेले वाकयुद्ध, राज ठाकरेंची नाशिकमधील विकासाचे दाखले देत घेतलेली प्रचार सभा, हाणामारी अशा विविध कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक रंगली होती. तर कोल्हापूरमध्येही हेच चित्र दिसत होते. दोन्ही महापालिकांमध्ये सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली. भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारीच्या घटनेने डोंबिवलीतील पाथर्लीत काही काळ तणाव होता. तर कल्याण पश्चिमेत बोगस मतदाराला पकडल्याचे वृत्त आहे. कल्याण डोंबिवलीतील मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याने नाव शोधताना मतदारांची तारांबळ उडत होती. शहरी भागात उत्साह नसला तरी डोंबिवली ग्रामीणमधील २७ गावांमध्ये मतदानाचा उत्साह होता. भालगावातील ग्रामस्थांनी मात्र मतदानावर बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला. कल्याण डोंबिवलीतील १२२ जागांसाठी ७५० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम बंद झाले आहे. 

कोल्हापूरमध्ये मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून यंदा सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये सदर बाजार येथे ताराराणीचे उमेदवार आणि मतदान केंद्रावरील अधिका-यांमध्ये वाद झाला होता. उमदेवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरु केल्याने वाद झाला होता. कोल्हापूरमधील ८१ जागांसाठी ५०६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.