शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

कांबा पुलाला संरक्षण कठडा नाही!

By admin | Updated: June 5, 2017 03:01 IST

कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : पाताळगंगा नदीजवळ असलेल्या कांबा गावाजवळील पुलाला संरक्षक कठडा नसल्याने नागरिक, तसेच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधी वा संबंधित शासनाचे अधिकारी लक्ष घालत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या पुलावरून चांभार्ली गावाकडे जाता-येताना नाइलाजास्तव प्रवाशांना या पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.चांभार्ली व कांबे गावांतील ग्रामस्थांना जोडून ठेवण्यासाठी हा उपयुक्त आहे. मात्र, पूल आमदार निधीतून बांधून चार ते पाच वर्षे झाली. तरी संरक्षक कठडा अद्याप बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहन उलटून नदीपात्रात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावरून विद्यार्थी, स्थानिक नागरिकांची नियमित वर्दळ असते. शिवाय, या पुलामुळेच कांबा व चांभार्ली गाव जोडले गेले आहे. त्यामुळे अनेक नागरिक या पुलावरून जाणे पसंत करतात. हा पूल एकेरी वाहतुकीसाठी अरुंद तर आहेच; परंतु पुलाला संरक्षक कठडा नसल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तसेच पावसाळ्यात या पुलावरून लहान मुले गतकाठीच्या साहाय्याने मासे पकडत असताना काही अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तरी संबंधितांनी तत्काळ लक्ष घालून संरक्षक कठडा उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.