शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 23:49 IST

महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

नाशिक : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचे शनिवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर व परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथील डिझेल दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वसंत पळशीकर १२ वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. या आजारपणातच त्यांचे निधन झाले. त्यांनी समाज प्रबोधन पत्रिका व नवभारत नियतकालिकांचे संपादकपदही भूषविले. लोकशाही, समाजवाद व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर सुमारे सातशे दीर्घलेखांसह त्यांनी विस्तृत लेखन केले. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-आंबेडकर विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. पळशीकर यांचा जन्म हैदराबादमध्ये १९३६ मध्ये झाला होता. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधीजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. त्यांचा मित्रपरिवारही भारतभर होता. भालचंद्र नेमाडे, भोळेसर यांच्यासह लहानथोर कार्यकर्त्यांचा त्यांच्या मित्र परिवारात समावेश आहे. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवा संघाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला स्वत:ला वाहून घेतले. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा - संमेलने यात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली. संथ आणि शांत शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)पळशीकर यांची साहित्यसंपदावसंत पळशीकर यांच्या साहित्यसंपदेत सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा ही वैचारिक पुस्तके आहेत. बी. आर. नंदा लिखित गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चरित्राचा व थिओडोर शुल्टझ यांच्या शेतीविषयक पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. सोव्हिएत रशियाची पन्नास वर्षे खंड १ व २ आणि मे. पुं. रेगे यांचा लेखसंग्रह विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धाचे त्यांनी संपादन केले आहे.