शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

‘जातीव्यवस्था हा भारतासाठी मोठा शाप’

By admin | Updated: August 2, 2016 04:01 IST

‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे.

डोंबिवली : ‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे. आपल्या भारतात जातीव्यवस्था मोठा शाप आहे. ती संपेल तेव्हाच भारत जगात महासत्ता होईल, असा विश्वास चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. शिवसेना व कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे नुकताच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिंकण्याची साधना’ हा मार्गदर्शनपर मेळावा अत्रे रंगमंदिरात झाला. या वेळी धर्माधिकारी बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. नरेशचंद्र, महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.धर्माधिकारी म्हणाले की, आपल्याला कोणालाही ज्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांचा मत्सर आणि मला काही येत नाही, त्याचा न्यूनगंड वाटण्याची गरज नाही. आपल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत होऊन भारतमातेची व देशाची सेवा घडो. राष्ट्रगीताचा सन्मान सर्वत्र राखला गेला पाहिजे.राज्यघटना व त्यामुळे मिळालेले मूलभूत अधिकारी हवेत, तर राष्ट्रप्रेम, कर्तव्य नाही का, असा सवालही त्यांनी केला. ज्यांचा मेंदू शाबूत आहे, तो प्रत्येक जण बुद्धिमान आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळ आणि कला याही बुद्धिमत्ताच आहेत. आपल्या बुद्धीचा कल आपण ओळखला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)