शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शाळांच्या परिसरात जंक फूडवर बंदी

By admin | Updated: November 13, 2016 02:28 IST

पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर

मुंबई : पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने खासगी व पालिका शाळांच्या शंभर मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अशी ठरावाची सुचना महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आली आहे. आई-वडील दोघंही नोकरदार असल्याने पाल्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांचेदुर्लक्षच होत असते. सकाळच्या वेळेत शाळा आणि कार्यालयासाठी तयारीच्या गडबडीत विद्यार्थ्यांना अनेकवेळा डब्ब्यात भाजी-पोळीऐवजी जंक फूड दिले जाते. बरीच मुले मधल्या सुट्टीत दुकानात जाऊन असे पदार्थ खातात. मात्र सतत जंक फूडचे सेवन केल्याने सुस्ती येणे, मेंदूचा विकास न होणे, लहान वयातच लठ्ठपणा येणे, मधुमेह अशा आजाराचे प्रमाण वाढत आहे.असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या हानीकारक असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा व मानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डब्ब्यातून जंक फूड देऊ नयेत, असे पालकांना आवाहन करावे. तसेच खाजगी व पालिका शाळेच्या आसपास शंभर मीटर परिसरात जंक फूड विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी काँग्रेसचे परमिंदर भामरा यांनी पालिका महासभेपुढे ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)जंक फूड म्हणजे काय?प्रक्रिया केलेले मसालेदार, चटपटीत खाद्यपदार्थ उदा. कॅण्डी, बेकरीचे पदार्थ, आईस्क्रीम, थंडपेय, पिझ्झा, बर्गर, फे्रंच फ्राईजसारख्या पदार्थांमध्ये पौष्टिक मूल्य नव्हे तर कॅलेरीज मात्र वाढतात. या खाद्यपदार्थांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम फ्लेव्हर वापरलेले असतात.देशाच्या राजधानीत बंदीदिल्ली सरकारने नुकतेच शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी केली आहे. शाळांमधील कॅन्टीनमध्ये जंक फूड ठेवू नये, अशी सुचनाही सरकारने केली आहे. काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डब्यातून पोळी-भाजी आणणे सक्तीचे केले आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांना जंक फूड खाण्याची सूट दिली जाते.जंक फूडचे आरोग्यावर दुष्परिणामयाचा परिणाम मेंदूवर होत असल्याने स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.अति प्रमाणात पदार्थखाल्याने कालांतराने भुकेवर नियंत्रण राहत नाही. याचा परिणाम मेंदूच्याविकासावर होत असल्याने काही काळाने काय खाल्ले, किती खाल्ले आणि किती भूक लागली आहे, यावर नियंत्रण राहत नाही.रसायनिक बदल होऊन कालांतराने त्या व्यक्तीमधील उदासिनतेचे प्रमाण वाढते. साखरेचे प्रमाण अधिक व मेद वाढविणारे पदार्थ खाल्याने मेंदूच्या रसायनिक कार्यपद्धतीत बदल होतो. शरीरात मेदचे प्रमाण वाढल्यास उदासिनता वाढत असल्याचे समोर आले आहे.अधिरपणा वाढतो, जंक फूड खाण्याची इच्छा रोखता येत नाही, भूक नसतानाही वारंवार खात राहण्याचीइच्छा होते.