शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

एलबीटी रद्द करण्यास ५ जूनची मुदत

By admin | Updated: May 27, 2014 05:45 IST

लबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल

सांगली : एलबीटी रद्द करण्यासाठी सरकारने ५ जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील २६ महापालिका क्षेत्रात बेमुदत व निर्णायक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फॅमचे (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्टÑ) अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी आज (सोमवारी) येथील राज्यव्यापी मेळाव्यात दिला. सांगलीच्या राजमती भवनात आज एलबीटीविरोधी कृती समितीच्या वतीने व्यापार्‍यांचा राज्यव्यापी मेळावा पार पडला. यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील व्यापारी-उद्योजक प्रतिनिधी सहभागी झाले होते. गुरनानी म्हणाले की, आजपासून राज्यातील एलबीटीविरोधातील दुसर्‍या टप्प्याचे व निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. आम्ही कराच्या विरोधात नव्हे, तर भ्रष्टाचार व छळवणुकीच्या विरोधात आहोत. त्यामुळेच व्यापार्‍यांची तसेच सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारा हा कर आम्हाला मान्य नाही. हा कर लादून सरकारने ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ दाखवली आहे. त्याचा प्रत्यय आता लोकसभा निवडणुकीपासून येऊ लागला आहे. सरकारने येत्या ५ जूनपर्यंत एलबीटी रद्दचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात व्यापारी आंदोलन छेडतील. आता हे आंदोलन निर्णायक स्वरूपाचे असेल. त्यासाठी राज्यभर जागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निकालाने काँग्रेस सरकारला झटका बसला आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. महाराष्टÑाच्या ग्राहकांनी काय पाप केले आहे, ज्यामुळे येथील सरकार अन्य राज्यांपेक्षा अधिक कर लावत आहे? (प्रतिनिधी)