शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

१ जूनपासून राज्यातील ६५ टोलनाके बंद

By admin | Updated: April 10, 2015 14:23 IST

येत्या १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टोलनाक्यांप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली असून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे.
१ जूनपासून या नव्या धोरणाची अमलबजावणी होणार आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. 
विधानसभा निवडणुकीत भाजपाने टोलमुक्तीचे स्वप्न दाखवत मत मिळवली होती. पण सत्तेत आल्यापासून टोलमुक्ती बाबत राज्य सरकारने काहीच पावले उचलली नव्हती. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत टोलमुक्तीची घोषणा केली. यानुसार राज्यातील ६५ टोलनाक्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कोल्हापूर टोलनाक्यासंदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती ३१ मे पर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र मुंबईतील सहा प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यावर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुंबई एंट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर ३१ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
 
कोणते टोलनाके होणार बंद 
 
> ठाणे - घोडबंदर 
> सोलापूर - बारामती
> औरंगाबादमधील ३ तर नागपूरमधील ५ टोलनाके होणार बंद.
> अमरावतीमधील १, चंद्रपूरमधील ३ टोलनाके बंद होणार.