शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

शास्तीकराची अद्यापही दुप्पट वसुली

By admin | Updated: July 12, 2017 03:31 IST

महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना व भाजपाने दिव्यात पेढे वाटले होते

अजित मांडके। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना व भाजपाने दिव्यात पेढे वाटले होते. परंतु, अद्यापही ती रद्दच झाली नसल्याचे उघड झाले आहे. अनधिकृत बांधकामांवर दुप्पट शास्ती लावून मालमत्ताकराची वसुली सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून, सत्ताधाऱ्यांनी मात्र, शास्तीनुसार वसुली सुरु नसल्याचे सांगितले. तर शास्तीबाबत अद्याप धोरण स्पष्ट झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून शास्ती रद्द केल्याबाबतचे एक पत्रदेखील मालमत्ताकर विभागाला आले असून त्यावर कार्यवाही झालेली नाही. यामुळे प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये या विषयावरून सावळागोंधळ असल्याचे दिसत आहे.शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांकडून मालमत्ताकराच्या दुप्पट रक्कम वसूल करण्याचे धोरण मागील काही वर्षे पालिका हद्दीत सुरु आहे. या विरोधात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यातच निवडणुकीच्या काही दिवस आधी राज्य शासनाने ही दुप्पट शास्ती रद्द केल्याचे बॅनर दिवा भागात दोन्ही पक्षांनी लावले होते. परंतु प्रशासनाने त्यावेळी असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान महासभेतदेखील या मुद्यावरुन रणकंदन माजले होते. त्यानंतर शास्ती न आकारता वसुली करण्याचा निर्णयही झाला होता. आतादेखील दुप्पट शास्ती आकारूनच वसुली होत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ मतांवर डोळा ठेवूनच सत्ताधाऱ्यांनी शास्ती रद्द झाल्याचा गवगवा केला होता. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडलेलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दुसरीकडे शास्तीबाबत सध्या काय धोरण आहे, याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचे भाजपाने सांगितले. तर शिवसेनेने शास्तीसाठी प्रशासन कोणतीही जबरदस्ती करीत नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे प्रशासनाकडे महिन्याभरापूर्वी शास्ती रद्द केल्याबाबत शासनाकडून एक पत्र आल्याची माहिती मालमत्ताकर विभागाने दिली. या पत्रात शास्ती रद्द करण्याबाबत काही टप्पे सुचविले आहेत. त्यानुसार आता याबाबत आयुक्तांकडे चर्चा करुन त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मालमत्ताकर विभागाचे प्रमुख ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.>मतांसाठी गवगवा?एक महिन्यापासून हे पत्र आले असतांनाही त्याची साधी भनकदेखील एकाही पक्षाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात केवळ मतांचा जोगवा मिळविण्यासाठीच शास्ती रद्द झाल्याचा गवगवा करण्यात आला होता. परंतु,आता त्याचे काय झाले शास्ती रद्द झाली की? नाही याची माहिती या पक्षांना नसल्याचे दिसले आहे. सध्यादेखील शास्ती लावूनच वसुली केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ ती रद्द झाल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते, ठामपाशास्ती आकारूनच वसुली सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ मतांसाठीच निवडणुकीच्या काळात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.- अविनाश जाधव,शहर अध्यक्ष, मनसेशास्तीसाठी कोणावरही दबाव आणला जात नाही, पालिकेकडून नियमानुसारच सध्या वसुली सुरु आहे, तसेच शास्ती रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला होता.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाशास्तीबाबत सध्या काय परिस्थिती आहे, याची फारशी माहिती नाही. रद्द झाली हे खरे आहे. परंतु पुढे काय झाले याची माहिती नाही.-मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपापरिपत्रकाचा विसर?जानेवारी महिन्यातच या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ६०० चौरस फुटांच्या घराकंडून शास्ती वसूल करु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर १ हजार चौ.फुटांच्या घरांकडून ५० टक्के आणि १ हजार चौ. फुटांपासून पुढील घरांसाठी आहे त्याच पद्धतीने शास्ती वसूल करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र, यावर काहीही कार्यवाही नाही.