शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

न्यायाधीशांनी केली घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: July 29, 2016 16:35 IST

येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात सरकारी पक्षाच्या मागणीवरून न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २९ - येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात सरकारी पक्षाच्या मागणीवरून न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी रूपेशकरिता आरोपीने घेतलेल्या चिप्सच्या दुकानापासून ते त्याची हत्या केली ते ठिकाण आणि त्याचा मृतदेह आणून टाकला त्या ठिकाणाचे अवलोकन केले. 

वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात गाजत असलेले रूपेश मुळे प्रकरण साक्ष संपल्याने आता युक्तीवादावर आहे. यातच सदर प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या आकक्षेपावरू सरकारी पक्षाच्या मागणीवरून खुद्द न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी केली. न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी करीत तपास अधिकारी, सरकारी व आरोपीच्या वकीलांकडून माहिती जाणून घेतली. 

हे अवलोकन पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसारच करण्यात आले. यात रूपेशच्या अपहरणापासून आरोपीने त्याला ज्या मार्गाने फिरविल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले त्याच मार्गाने शुक्रवारी अवलोकन करण्यात आले. आरोपीने रूपेशचे अपहरण करण्यापूर्वी प्रथम ज्या दुकानातून चिप्सचे पॅकेट घेतले त्या दुकानापासून या पाहणीला प्रारंभ झाला. न्यायाधीशांसह उपस्थितांचा ताफा रूपेशच्या घरापर्यंत पोहोचला.

पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणाहून आरोपी आसिफ शहा उर्फ मुन्ना पठाण याने रूपेशला आॅटोत बसविले त्या ठिकाणाची पाहणी त्यांनी केली. येथून सदर ताफा मुन्ना पठाण याने रूपेशची हत्या केली त्या ठिकाणी पोहोचला. नागगपूर-यवतमाळ बायपासवर असलेल्या या ठिकाणाची पाहणी करून न्यायाधीश चांदेकर व त्यांचा ताफा रूपेशचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथे पोहोचला.

येथे ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत आरोपीने रूपेशचा मृतदेह टाकला त्या ठिकाणाची पाहणी केली. येथून त्यांनी आरोपी ज्या मार्गे परत गेला त्या मार्गाची माहिती घेत आर्वी नाका मार्गे हे पथक न्यायालयात रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत सरकारी वकील अनुराधा सबाने, अ‍ॅड. श्याम दुबे, आरोपीचे वकील शहा, अ‍ॅड. परमानंद टावरी, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर बेलखोडे व रूपेशचे वडील उपस्थित होते. 

आरोपीने जंगल सोडून शहरात मृतदेह का फेकला ? पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने रूपेशची हत्या नागपूर-यवतमाळ मार्गावर असलेल्या आलोडीनजीकच सुनसान ठिकाणी केली. मग त्याने त्याचा मृतदेह त्याच भागात न टाकता ज्या भागात वर्दळ आहे, अशा ठिकाणी का आणला असा सवाल आरोपीचे वकील शहा यांनी केला आहे, यावर पोलीस काय उत्तर देतात, हे येत्या सुनावणीत कळणार आहे.

यासह सरकारी पक्षाकडे रूपेशचा रक्त अहवाल नाही, शवविच्छेदन अहवालाची खरी प्रत नाही, रासायनिक विशेषज्ज्ञांचा खरा अहवाल नाही, अखेरचा साक्षदार कोण या बाबत पोलिसांत सुसुत्रता नसल्याचे आरोपीच्या वकीलाने सांगितले आहे. यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय वर्तवित प्रकरणाची पुन्हा नव्याने तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.