शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणार

By admin | Updated: October 4, 2014 01:35 IST

दस:याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामा प्रकाशित केला. प

पनवेल : दस:याच्या शुभमुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षाने शुक्रवारी पनवेल व उरण मतदारसंघातील मतदारांकरिता जाहीरनामा प्रकाशित केला. पनवेल विधानसभेतील मतदारांकरिता बाळाराम पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी केले. तर उरण मतदारसंघातील मतदारांकरिता आमदार विवेक पाटील यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील म्हणाले, की शेकाप दिलेला शब्द कायम पाळत आलेला आहे. त्यामुळे जाहीरनाम्यातील प्रत्येक काम पूर्ण केले जाईल. शेकापची ऐतिहासिक निशाणी खटारा पुन्हा मिळाल्याने कार्यकत्र्यामध्ये उत्साह दिसत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 
आमदार विवेक पाटील यांनी सांगितले की, आम्ही केलेली विकासकामे म्हणजेच आम्ही पाळलेले जाहीरनाम्यातील वचन आहे. या वेळी जाहीर केलेली कामे 1क्क् टक्के पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. उरणच्या सर्वागीण विकासाचा अंतर्भाव असणारा आमचा जाहीरनामा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे.
अतिशय वेगळय़ा धाटणीच्या या जाहीरनाम्यातील सादरीकरणात वेगळेपण जाणवते. अन्य पक्षांच्या नेहमीच्या रटाळ निबंध स्वरूपाला छेद देत शेकापने या वेळेस छायाचित्रंच्या माध्यमातून मतदारांर्पयत पोहोचण्याचा स्तुत्य मार्ग अवलंबिला आहे.
याप्रसंगी आमदार विवेक पाटील, शेकापचे पनवेल विधानसभेचे उमेदवार बाळाराम पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
 
सर्वच प्रमुख्य मुद्दय़ांचा समावेश 
च्जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्तींना समाविष्ट करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज कलादालन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, वारकरी भवन, अत्याधुनिक शिक्षण, झोपडपट्टी पुनर्विकास, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, मुबलक पाणीपुरवठा, सिडको वसाहतीतील नागरी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती, टोलमुक्त रोड, रोजगाराभिमुख व्यवसायिक प्रशिक्षण, जेनेरिक औषधांची सेंटर्स, माध्यान्ह भोजन योजना, महिलांसाठी वसतिगृह व पाळणाघरे, स्वतंत्र पासपोर्ट केंद्र, महिलांसाठी स्वयंरोजगार व स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्रे, मच्छीमार व शेतक:यांसाठी शीतगृहे, गावठाण विस्तार योजना, फ्री वायफाय झोन, पर्यटन विकास, घनकचरा व्यवस्थापन योजना, प्रदूषणमुक्त नद्या, आदिवासी विकास, अंतर्गत वाहतूक व्यवस्था, सेंट्रल किचन योजना आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.