शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

चाकरमान्यांचा गणेशोत्सवात कोकणचा प्रवास सुकर

By admin | Updated: August 25, 2016 05:52 IST

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात.

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात. यंदा कोकणात आणि त्यामार्गे जाणाऱ्या २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गणेशोत्सवात कोकणात जाताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवासी उभ्याने प्रवास करतात. काहींना तर दोन डब्यांतील जागेमध्ये किंवा बाथरूमजवळही उभे राहावे लागते. प्रवाशांची वाढती मागणी पाहता आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच विशेष फेऱ्यांचे नियोजन केले जाते. यंदा २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, या सर्व ट्रेन चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, करमाळी, मडगावसाठी सोडण्यात येतील. एकूण फेऱ्यांपैकी २४ फेऱ्या या वांद्रे टर्मिनस आणि १४ फेऱ्या अहमदाबादसाठी व्हाया वसईमार्गे असल्याचे सांगण्यात आले. काही ट्रेन या फक्त गणेशोत्सवासाठीच असल्याने त्या ट्रेनला नव्याने क्रमांक देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ट्रेनची माहिती प्रवाशांना वेळोवेळी मिळावी, यासाठी स्थानकांवर उद्घोषणा करण्यात येणार आहे. तसेच पाण्याची व्यवस्था, रेल्वे पोलीस आणि काही स्थानकांवर रेल्वे कर्मचारीही मोठ्या प्रमाणात असतील, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)