शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘जिंदादिल’ शायर बशर नवाज यांचे निधन

By admin | Updated: July 10, 2015 02:29 IST

‘जिंदादिल’ शायर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या बशरसाहब यांच्या

औरंगाबाद : ‘जिंदादिल’ शायर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या बशरसाहब यांच्या निधनामुळे औरंगाबादची ‘शान’ हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. जीवनातील खरेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शायरीतून केला. आधुनिक विचारांचे शायर असलेल्या बशर नवाज यांनी गजलेच्या परंपरेचा मात्र नेहमीच सन्मान ठेवला. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र कळाले. त्यांच्या विविध समाजातील आणि शायरीच्या चाहत्यांनी तसेच आप्तेष्टांनी त्यांच्या घरी धाव घेतली. गुरुवारी पहाटे ते पुस्तक वाचत होते. त्यांना सकाळी आठ- साडेआठ वाजता चहा लागत असे, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ते खोलीतून न आल्याने घरातील मंडळी त्यांच्या खोलीमध्ये गेली. त्यावेळी त्यांच्या छातीवर पुस्तक दिसले. सुरुवातीला ते झोपेत असावेत असे वाटले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात आले. बशर नवाज यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली आणि चार मुले असा परिवार आहे. १८ आॅगस्ट १९३५ साली जन्मलेल्या बशर नवाज यांनी अगदी कमी वयातच आपल्या शायरीची चुणूक दाखविली होती. देश-विदेशात त्यांनी अनेक मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला. देशातील तसेच विदेशातील विशेष करून आखाती देशांत आणि पाकिस्तानात त्यांना मुशायऱ्यासाठी आवर्जून बोलविले जायचे. त्यांची राहणी अतिशय साधी होती. पायजमा, कुर्ता आणि जॅकेट असा त्यांचा वेश असे. त्यांच्यात कधीही अहंभाव दिसला नाही. ‘करोगे याद तो, हर मौज याद आयेगी...’ ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया...’ या ‘बाजार’ चित्रपटातील त्यांची गाणी खूपच भावली. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत ते कधीच रमले नाहीत. जीवनातील विसंगतीवर त्यांनी आपल्या शायरीतून अचूक बोट ठेवले. रमजाननंतर ते सौदी अरेबियाला भारतीय वकिलातीतर्फे आयोजित मुशायऱ्यासाठी जाणार होते. राज्य उर्दू अकादमीच्या पुरस्कारासह, मिर्झा गालिब पुरस्कारानेही ते सन्मानित झाले होते.