शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

‘जिंदादिल’ शायर बशर नवाज यांचे निधन

By admin | Updated: July 10, 2015 02:29 IST

‘जिंदादिल’ शायर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या बशरसाहब यांच्या

औरंगाबाद : ‘जिंदादिल’ शायर म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या बशरसाहब यांच्या निधनामुळे औरंगाबादची ‘शान’ हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. जीवनातील खरेपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शायरीतून केला. आधुनिक विचारांचे शायर असलेल्या बशर नवाज यांनी गजलेच्या परंपरेचा मात्र नेहमीच सन्मान ठेवला. त्यांच्या निधनाचे वृत्त सकाळी सर्वत्र कळाले. त्यांच्या विविध समाजातील आणि शायरीच्या चाहत्यांनी तसेच आप्तेष्टांनी त्यांच्या घरी धाव घेतली. गुरुवारी पहाटे ते पुस्तक वाचत होते. त्यांना सकाळी आठ- साडेआठ वाजता चहा लागत असे, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ते खोलीतून न आल्याने घरातील मंडळी त्यांच्या खोलीमध्ये गेली. त्यावेळी त्यांच्या छातीवर पुस्तक दिसले. सुरुवातीला ते झोपेत असावेत असे वाटले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र त्यांची प्राणज्योत मालवल्याचे लक्षात आले. बशर नवाज यांच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली आणि चार मुले असा परिवार आहे. १८ आॅगस्ट १९३५ साली जन्मलेल्या बशर नवाज यांनी अगदी कमी वयातच आपल्या शायरीची चुणूक दाखविली होती. देश-विदेशात त्यांनी अनेक मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला. देशातील तसेच विदेशातील विशेष करून आखाती देशांत आणि पाकिस्तानात त्यांना मुशायऱ्यासाठी आवर्जून बोलविले जायचे. त्यांची राहणी अतिशय साधी होती. पायजमा, कुर्ता आणि जॅकेट असा त्यांचा वेश असे. त्यांच्यात कधीही अहंभाव दिसला नाही. ‘करोगे याद तो, हर मौज याद आयेगी...’ ‘दिखाई दिये यूँ के बेखुद किया...’ या ‘बाजार’ चित्रपटातील त्यांची गाणी खूपच भावली. तरीही हिंदी चित्रपटसृष्टीत ते कधीच रमले नाहीत. जीवनातील विसंगतीवर त्यांनी आपल्या शायरीतून अचूक बोट ठेवले. रमजाननंतर ते सौदी अरेबियाला भारतीय वकिलातीतर्फे आयोजित मुशायऱ्यासाठी जाणार होते. राज्य उर्दू अकादमीच्या पुरस्कारासह, मिर्झा गालिब पुरस्कारानेही ते सन्मानित झाले होते.