शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

जायकवाडीचे पाणी पेटणार

By admin | Updated: December 8, 2014 02:29 IST

भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील

अहमदनगर : भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याच्या निर्णयाला उत्तरेतील सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने आगामी काळात अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ पाणी सोडण्याला विरोध होणार असल्याने सोमवारी भंडारदरा-निळवंडे धरण व प्रवरा नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़ मराठवाड्याचा मुख्य पाणीस्त्रोत असलेल्या जायकवाडी धरणाच्या जलवाहिन्या नगर व नाशिक जिल्ह्यातून जातात़ त्यामुळे उर्ध्व भागात अडविलेल्या पाण्यावर आमचा हक्क असून हे पाणी आम्हाला मिळावे, अशी मागणी मराठवाड्यातून सातत्याने होते. दुसरीकडे नगर जिल्ह्यातही दुष्काळाची परिस्थिती असून जायकवाडीला पाणी सोडणे म्हणजे येथील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे़ पाणी प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी उत्तरेतील सहकारी संस्थांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊन खंडपीठाने आवश्यकता असेल तरच जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी सोडावे, असा निकाल दिला होता़खंडपीठात त्याचदरम्याम पाण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे़ प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ५ डिसेंबरला मराठवाडा विकास महामंडळाने भंडारदरा-निळवंडे व मुळा धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने राजकीय संघर्ष पेटला आहे़ भंडारदरा धरणातून ४़३० तर मुळा धरणातून ३़५९ असे एकूण ७़८९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ भंडारदरातून सोमवारी तर मुळा धरणातून मंगळवारी पाणी सोडण्यात येणार आहे़ मात्र, हे पाणी सोडण्यास अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी व नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे़ (प्रतिनिधी)