शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जननीच करू शकते तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका

शांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव उत्साहातनागपूर : मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज येथे केले.सेवासदन समितीच्या परिसरात आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. अनुराधा रिधोरकर, राष्ट्रसेविका समितीच्या विदर्भ कार्यवाहिका सुलभा गौड, नागपूर महानगर कार्यवाहिका करुणा साठे, अखिल भारतीय सह शारीरिक प्रमुख मनिषा संत, पूर्व प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे उपस्थित होत्या. शांताक्का म्हणाल्या, डॉक्टर जसे प्रेमाने आजारी व्यक्तीला स्पर्श करून त्याचा अर्धा आजार दूर करतात. त्याच प्रमाणे जननी सुद्धा राष्ट्राची निमिर्ती आपल्या मातृत्वभावाने करू शकते. त्यासाठी धैर्य ठेऊन अन्यायाला विरोध करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनुराधा रिधोरकर म्हणाल्या, आजही अनेक निर्भया बळी जात असून स्त्री सबला झालेली नाही. राष्ट्रसेविका समितीचे आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य महान आहे. हातात हात घालून पुढे जाणे हेच खरे स्त्रीत्व आहे. कुटुंबात मुलांचे ऐकून घेणे गरजेचे असून घरातील आई शिस्तप्रिय असायला हवी. मुलांनी जंक फूड टाळून आठवड्यातून किमान तीन दिवस पायी चालण्याची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी महिलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी विविध आत्मरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझीम, दंडयोग, योग चापाचे प्रात्यक्षिक, ध्वज संचलन, सांघिक योग, सांघिक गीत सादर केले. संचालन डॉ. लीना गहाने यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)