शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

‘जलदूत’ जुलै अखेर पर्यंतच धावणार ?

By admin | Updated: July 20, 2016 18:11 IST

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली 'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि.20 -  मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली  'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखेपर्यंतचीच रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदतवाढ करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे ही गाडी बंद करावी लागणार असल्याचे रेल्वेच्या प्रशासकीय सुत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण अद्यापही कोरडेच असून या धरणामध्ये अवघा ०.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रेल्वेने केला जाणारा पाणी पुरवठाही बंद झाल्यास ऐन पावसाळयातही लातूरकरांना पाण्यासाठी वणवन करावी लागण्याची चिन्हे आहेत. लातूर शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाखां़च्या आसपास असून शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागील वर्षी मांजरा धरण कोरडेठाक असल्याने लातूरकरांचे पिण्याचे पाणीही मिळणे कठीण बनले होते. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने उपाय योजना करून थेट केंद्रातूनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून मिरजहून लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून घेतली होती. ही गाडी १९ एप्रिल पासून मिरजहून सुरू करण्यात आली आहे. या गाडीतून एका दिवशी ५० टँकरच्या रेक द्वारे २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविले जाते. तर निम्न तेरणा धरणातून टँकरद्वारे २५ लाख लिटर असे प्रतिदिन ५० लाख लिटर पाणी लातूरसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी प्रती व्यक्ती २०० लीटर प्रमाणे टँकरद्वारे वाटप केले जात आहे.