शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

‘जलदूत’ जुलै अखेर पर्यंतच धावणार ?

By admin | Updated: July 20, 2016 18:11 IST

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली 'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि.20 -  मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली  'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखेपर्यंतचीच रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदतवाढ करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे ही गाडी बंद करावी लागणार असल्याचे रेल्वेच्या प्रशासकीय सुत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण अद्यापही कोरडेच असून या धरणामध्ये अवघा ०.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रेल्वेने केला जाणारा पाणी पुरवठाही बंद झाल्यास ऐन पावसाळयातही लातूरकरांना पाण्यासाठी वणवन करावी लागण्याची चिन्हे आहेत. लातूर शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाखां़च्या आसपास असून शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागील वर्षी मांजरा धरण कोरडेठाक असल्याने लातूरकरांचे पिण्याचे पाणीही मिळणे कठीण बनले होते. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने उपाय योजना करून थेट केंद्रातूनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून मिरजहून लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून घेतली होती. ही गाडी १९ एप्रिल पासून मिरजहून सुरू करण्यात आली आहे. या गाडीतून एका दिवशी ५० टँकरच्या रेक द्वारे २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविले जाते. तर निम्न तेरणा धरणातून टँकरद्वारे २५ लाख लिटर असे प्रतिदिन ५० लाख लिटर पाणी लातूरसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी प्रती व्यक्ती २०० लीटर प्रमाणे टँकरद्वारे वाटप केले जात आहे.