शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

‘जलदूत’ जुलै अखेर पर्यंतच धावणार ?

By admin | Updated: July 20, 2016 18:11 IST

मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली 'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि.20 -  मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने सुरू केलेली  'जलदूत' 31 जुलै पर्यंतच धावण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून रेल्वे प्रशासनाकडे या तारखेपर्यंतचीच रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही मुदतवाढ करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे ही गाडी बंद करावी लागणार असल्याचे रेल्वेच्या प्रशासकीय सुत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण अद्यापही कोरडेच असून या धरणामध्ये अवघा ०.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रेल्वेने केला जाणारा पाणी पुरवठाही बंद झाल्यास ऐन पावसाळयातही लातूरकरांना पाण्यासाठी वणवन करावी लागण्याची चिन्हे आहेत. लातूर शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाखां़च्या आसपास असून शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागील वर्षी मांजरा धरण कोरडेठाक असल्याने लातूरकरांचे पिण्याचे पाणीही मिळणे कठीण बनले होते. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने उपाय योजना करून थेट केंद्रातूनच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून मिरजहून लातूरला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून घेतली होती. ही गाडी १९ एप्रिल पासून मिरजहून सुरू करण्यात आली आहे. या गाडीतून एका दिवशी ५० टँकरच्या रेक द्वारे २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविले जाते. तर निम्न तेरणा धरणातून टँकरद्वारे २५ लाख लिटर असे प्रतिदिन ५० लाख लिटर पाणी लातूरसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी प्रती व्यक्ती २०० लीटर प्रमाणे टँकरद्वारे वाटप केले जात आहे.