शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

जैन धर्म हा विज्ञान निष्ठ धर्म

By admin | Updated: April 23, 2015 04:59 IST

भगवान महावीरांनी तपस्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला. या संदेशाने मानव जातीचे कल्याण होईल. जैन धर्म हा विज्ञान निष्ठ असून आज डॉक्टर जे सांगतात

आर्णी (यवतमाळ) : भगवान महावीरांनी तपस्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला. या संदेशाने मानव जातीचे कल्याण होईल. जैन धर्म हा विज्ञान निष्ठ असून आज डॉक्टर जे सांगतात तेच हजारो वर्षापूर्वी भगवान महावीरांनी सांगितले, असे प्रतिपादन लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी तप आराधिका प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांच्या बेले बेले पाचवे वर्षीतपाच्या पारणा महोत्सवात केले.यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आ. ख्वाजा बेग, नांदेडचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, मिठालाल कांकरिया, लोकमत मीडिया प्रा.लि.नागपूरचे संचालक (परिचालन) अशोक जैन, कन्हैय्यालाल रुणवाल प्रमुख पाहुणे होते. खा. दर्डा म्हणाले, आम्ही येथे वर्षीतप पारणा महोत्सवात नमन करायला आलो. या कार्यक्रमातून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. जैन धर्म हा विज्ञान निष्ठ असून या धर्मातील प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे. सायंकाळपूर्वी जेवण करा, गरम पाणी प्या हे हजारो वर्षापूर्वी महावीरांनी सांगितले. आज तेच तत्व डॉक्टर मंडळी उत्तम आरोग्यासाठी सांगतात. प.पू. प्रीतीसुधाजी म.सा. यांचा नागपुरात तब्बल सहा महिने चातुर्मास कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सूचविलेल्या विविध विषयांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या प्रवचनाला तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहरावसुद्धा आले होते. मांसाहाराला विरोध करण्यात आला. मांसाहाराच्या विरोधात मी संसदेत ४० मिनिटे भाषण दिले. प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांना उसाचा रस देऊन वर्षीतपाची सांगता झाली. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी पारणाची बोली लावली. जैन श्रावक संघाद्वारे प.पू. विशालप्रभाजी म.सा. यांना तपतेजस्वीनी पदवी देण्यात आली. पुलगाव येथील कांताबाई कांतीलाल लुंकड यांच्यासह राज्याच्या विविध भागातील ४५ आराधकांच्या वर्षीतपाचे पारणे झाले. वर्षीतप म्हणजे एक दिवस उपवास आणि एक दिवस भोजन असे अखंड वर्षभर केले जाते. सर्वप्रथम हे तप आदिनाथ भगवान यांनी केले होते. हीच परंपरा आजही सुरू असून अक्षय तृतीयेच्या दिवशी उसाच्या रसाने पारणे केले जाते. खा. दर्डा यांच्या हस्ते प्रभाकिरण विशेषांकाचे प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)