शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

आयटीआय प्रवेशाला रविवारपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: September 23, 2016 04:39 IST

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अखेर प्रशासनाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे

मुंबई : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अखेर प्रशासनाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रशिक्षण महासंचालनालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल ८ दिवसांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार आहेत.याआधी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली होती. मात्र तेव्हा दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता. त्यामुळे फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. याची दखल घेत, गुरुवारपासून प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात करण्यात आली. याआधी १२ सप्टेंबरला महासंचालनालयाने मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे १३ दिवसांपैकी राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ ४ दिवसांत प्रवेश अर्ज करावे लागणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश उशीराने सुरू झाल्याचे व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण शासकीय व अनुदानित आयटीआयमधील ७ हजार ७५२, खासगी आयटीआयमधील एकूण १८ हजार ८४२ जागा रिक्त असून लाखो विद्यार्थी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)