शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

चंद्रपूरचा इटनकर राज्यात पहिला

By admin | Updated: June 13, 2014 01:49 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले,

युपीएससीचा निकाल जाहीर : देशात गौरव अग्रवाल अव्वलमुंबई/पुणे/नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानच्या गौरव अग्रवाल याने प्रथम स्थान पटकाविले, तर चंद्रपूरच्या विपीन इटनकर याने राज्यातून अव्वल स्थान पटकविले आहे. त्याने देशाच्या यादीत चौदावा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील सुमारे ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांची या परीक्षेत निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने डिसेंबर २०१३ मध्ये मुख्य परीक्षा घेतली होती. तर मे आणि जून महिन्यात मुलाखती झाल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १ हजार १२२ उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये ५१७ खुल्या गटातील, ३२६ ओबीसी, १८७ एससी आणि ९२ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. यशस्वी उमेदवारांमध्ये १५ अपंग उमेदवारांचाही समावेश आहे. आयोगाने या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि ब या पदांवर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.राज्यातून सुमारे दीडशे उमेदवार अंतिम परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी सुमारे ऐंशी ते नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले असून पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये राज्यातील चार उमेदवारांचा समावेश झाला आहे. प्रथमच नव्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा घेण्यात आली होती.यंदा यूपीएससी परीक्षेला राज्यातून सुमारे साडेतीन लाख उमेदवार बसले होते. त्यामधून मुख्य परीक्षेसाठी साधारण १७ हजार उमेदवारांची आणि मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी ३ हजार उमेदवार निवडण्यात आले होते. यामधून १ हजार १२२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उत्तीर्ण उमेदवारांमधून आयएएस १८०, आयएफएस ३२, आयपीएस १५०, केंद्रीय सेवा गट अ ७१०, गट ब १५६ या पदांवर नेमणूक होणार आहे.सध्या या चार प्रकारच्या सेवांमध्ये मिळून १,२२८ रिक्त पदे नियुक्तीसाठी उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने आयोगास कळविले आहे. म्हणजेच निवड झालेल्या सर्वांना नियुक्त्या मिळू शकतील. (प्रतिनिधी)विपीनच्या भरारीलाजिद्दीचे पंखअभ्यासाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यात युपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करताना नियोजनबद्ध अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. मुळात नोकरी सांभाळून आणि नोकरीतील ताणतणाव सांभाळून अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे, याचा अनुभव मी घेतला. पण मनावरचा संयम, कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर निश्चितच यश मिळते, असे मत युपीएससी परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या विपीन इटनकरने लोकमतशी बोलताना व्यक्त केले. या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर खूप मोठे समाधान मिळाल्याची भावनाही त्याने यावेळी व्यक्त केली. विपीनने २००८ साली मेयो येथून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय पदवी एम. डी. करण्याचाच त्याचा प्रयत्न होता. दरम्यानच्या काळात चंदीगड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे शिक्षण की नोकरी, या द्वंद्वात नोकरी करणे योग्य वाटले आणि चंदीगडला नोकरी पत्करली. सध्या तेथेच नोकरीसह युपीएससीची तयारी करून यश संपादन केले. परीक्षेच्या तयारीविषयी बोलताना विपीन म्हणाला, जवळपास ८ ते ५ नोकरी केल्यानंतर परीक्षेची तयारी केली. नोकरी म्हटली की ताणतणाव आलेच. त्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना आॅपरेशन्स, पेशंटची तपासणी हे व्यस्त ठेवणारे काम होते. नोकरी झाल्यावर अभ्यास करण्याची शक्ती क्षीण झालेली असायची. पण मनात जिद्द होती. यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची आणि थेट देशाच्या सेवेत सहभागी होण्याची मनोमन इच्छा होती. त्यामुळे संयमाने अभ्यासाला लागलो. यापूर्वीही तीनदा ही परीक्षा दिली असल्याने साधारणत: अभ्यासक्रमाची माहिती होती. पण परीक्षा दिल्यावरही यश मिळाले नाही. चौथ्या प्रयत्नात मात्र यश मिळाले. चंद्रपूरच्या तुकूम भागातील आयप्पा मंदिराजवळ राहणाऱ्या विपीनचे शालेय शिक्षण चंद्रपूर येथील विद्यानिकेतनमध्ये झाले. या यशात पत्नीचा फार मोठा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. तिनेच मला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या यशाचे संपूर्ण श्रेय माझी पत्नी आणि आईला आहे.