शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नाबार्डच्या कर्जातून ५२ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

By अतुल कुलकर्णी | Updated: August 8, 2019 02:47 IST

मराठवाड्यासाठी ३३८०; विदर्भासाठी ३८४७ तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ७७७१ कोटी मिळणार

- अतुल कुलकर्णी मुंबई : जलसंपदा विभागाच्या ३१३ प्रकल्पांपैकी १० मोठे, १८ मध्यम आणि २२ लघू असे ५२ प्रकल्पांसाठी नाबार्डच्या वतीने १५ हजार कोटींचे कर्ज काढण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे. या निधीतून मराठवाड्यासाठी ३३८०.८९ कोटी, विदर्भासाठी ३८४७.५९ कोटी तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ७७७१.५२ कोटी मिळतील, अशी माहिती लोकमतशी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.जे ३१३ प्रकल्प आज बांधकामाधिन आहेत त्यावर आजपर्यंत ८३,३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. (यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातील खर्चही धरलेला आहे) हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी ९३,५७० कोटींचा निधी आणखी लागणार आहे. त्यानंतरच राज्यातील २८.७० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी येत्या तीन वर्षांत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून २६ प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी, बळीराजा जलसंजीवनी योजनेतून ९१ प्रकल्पांसाठी १५,३२५ कोटी, मल्टी लॅटरल इनव्हेसमेंट गॅरंटी योजनेतून १० प्रकल्पांसाठी ४२४३ कोटी आणि नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून ३० प्रकल्पांसाठी १६४५ कोटी खर्च केले जाणार आहेत. तीन वर्षांत या चार योजनांमधून १५७ प्रकल्पांसाठी ४३,६११ प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.त्याशिवाय ५२ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून घेतले जातील. हा निधी २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांत खर्च केला जाईल. या ५२ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प विदर्भातील आहेत. तर ७ प्रकल्प मराठवाड्यातील आणि २९ प्रकल्प उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.या १५ हजार कोटींचे वाटप राज्यपालांच्या निर्देशानुसार केले जात असल्याचे सांगून महाजन म्हणाले, हा प्रस्ताव २०१८-१९ मध्येच सादर करण्यात आला होता. आज निर्णय घेताना जलसंपदा विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मदतीने या कर्जासाठी कमीतकमी व्याजदर व मुद्दल परतफेडीसाठी दीर्घ मुदत यांचा विचार करुन वित्तीय संस्था निश्चित केली जाणार आहे. या ५२ प्रकल्पांमुळे तीन वर्षांत ८९१ दलघमी पाणीसाठी निर्माण होईल.